HW News Marathi
Covid-19

कोरोनाविरुद्धच्या लढाईत पोलीस दलातील चौथा बळी

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. हा लॉकडाऊन योग्य पद्धतीने पालन करण्यासाठी पोलीस दल दिवस रात्र आपल्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. मात्र, यात पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचा कोरोनाची लागण होऊन मृत्यू झाला आहे. मुंबई पोलीस दलातील आज (२९ एप्रिल) एका पोलीस नाईक कर्मचाऱ्यांचा त्यांचा जीव मगावला आहे. पोलीस दलातील आतापर्यंत कोरोनामुळे चार जणांचा बळी गेला आहे. मुंबई पोलीस दलातील नाईक वरपे हे कोरोनाशी युद्ध करताना शहीद झाले आहे. वरपे यांचा मृत्यू मालाडाच्या लाईफ लाईन रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

याआधी २६ एप्रिलला ५२ वर्षीय हवालदाराचे निधन झाले, तर २५ एप्रिलला ५७ वर्षीय हवालदारालाही कोरोनामुळे प्राण गमवावे लागले होते. संबंधित कर्मचारी वाकोला पोलीस ठाण्यात कार्यरत होता, तर वरळीचा रहिवासी होता. कुर्ला ट्रॅफिक विभागात हवालदार म्हणून कार्यरत असलेल्या हवालदाराचा काल (२७ एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाल होता.

कोरोनामुळे मुंबई पोलीस दलातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊन त्यांचा मृत्यू आहेत. या पाश्वभूमीवर ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि आजार असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना घरीच राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती पोलीस आयुक्त परमबिर सिंह यांनी दिली. या पोलीस कर्मचाऱ्यांना काल (२७ एप्रिल) लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांची काळजी करण्याचे नाटक करु नका !

News Desk

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून राज्यातील जनतेला रमजान ईदच्या शुभेच्छा!

News Desk

‘म्युकर मायकॉसीस’च्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार | राजेश टोपे

News Desk