HW News Marathi
महाराष्ट्र

आता नाना पटोलेंनीही दिला राजीनामा

मुंबई | लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यानंतर महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दिला. यानंतर आता काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी अखिल भारतीय काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला आलेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

नाना पटोले यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर ट्वीट केले आहे. पटोले म्हणाले की, “काँग्रेसला आलेले अपयशाची जवाबदारी सामूहिक आहे. त्यामुळेच मी सुद्धा आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. तसेच माझ्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सर्व संघटन बरखास्त करत आहे. तसेच, राहुल गांधींच्या समर्थनार्थ यापुढे काँग्रेसचा सैनिक म्हणून काम करत राहणार असल्याचंही पटोले म्हणाले.”

काँग्रेसच्या अनेक काँग्रेसच्या जेष्ठ नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पदाचे राजीनामे दिले आहेत. राहुल यांचा राजीनामा पक्षाने अजूनही स्वीकारला नसला तरीही ते आपल्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे काँग्रेस किसान सभेच्या अध्यक्षपदाचा पटोले यांनी राजीनामा दिला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गृहमंत्री पदाच्या बदलीच्या चर्चेवर कॉंग्रेसने दिली ‘ही’ प्रतिक्रिया

News Desk

शिवसंघ सोशल फाउंडेशनची पोलीस बांधवांसोबत अनोखी रक्षाबंधन!

News Desk

घरभाडे वसुली तीन महिने पुढे ढकलावी घर भाडे न दिल्याने भाडेकरूंना निष्कासित करू नये, राज्य सरकारच्या सूचना

News Desk