HW News Marathi
देश / विदेश

“लोकांच्या चिता जळल्या म्हणून 100 कोटी लशीचा उत्सव का”? नाना पटोले

बीड | बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला. ‘ मोदी सरकार 100 कोटी लसीचा उत्सव साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा परखड सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.’कोरोना काळात फुकट लस दिली म्हणून पेट्रोल डिझेल वाढवले त्यात 80 टक्के लोकांनी लस विकत घेतली 20 टक्के लोकांना फुकट दिली. पण 100 कोटी लसीचा उत्सव साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल पटोलेंनी उपस्थितीत केला.

गरिबाच्या घरचे दिवे विझून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न

‘केंद्रामधील भाजप सरकार शेतकरी विरोधी आहे, शेतकऱ्यांना संपवण्यासाठी प्रयत्न सुरू म्हणून ही लढाई एकट्या नाना पटोलेची नाही. जर आज आपण जागे झालो नाहीतर बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान ही संपेल आणि आपले स्वातंत्र्य ही संपेल, असंही पटोले म्हणाले. ‘ज्या पद्धतीने थोतांड तुम्ही या देशात निर्माण केलं,गरिबाच्या घरचे दिवे विझून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला, याचा विरोध कॉंग्रेस करेल. डिझेल,पेट्रोलचे दर वाढवायची गरज नसताना ही दरवाढ केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला लुटायच काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

100 कोटी लसीचा उत्सव साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल पटोलेंनी उपस्थितीत केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात

Aprna

“देश का चौकीदार चोरी कर गया मोदी जी” | राहुल गांधी

swarit

उद्या बाबरी खटल्यावर सीबीआयचे न्यायालय निकाल देणार, आरोपींना हजर राहण्याचे आदेश

News Desk