HW News Marathi
महाराष्ट्र

मित्रपक्षांचं काही माहित नाही पण आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार – नाना पटोले

बुलढाणा | राज्यात निवडणूकांचं वारं वाहू लागलं आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून आमच्या मित्र पक्षांचं काय प्लानिंग आहे याबद्दल मला कल्पना नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नाना पटोलेंनी आपल्या या वक्तव्याच्या माध्यमातून महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचं तर दाखवून दिलं नाही ना? असा प्रश्न आता कार्यकर्त्यांना पडला आहे. त्यामुळे ठाकरे सरकारमध्ये बिघाडी खरचं आहे का असा प्रश्न समोर येऊ लागला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “ज्या काही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्यामध्ये काँग्रेस स्वबळावर लढेल. ते आमचे मित्र पक्ष आहेत आणि मित्र पक्षांचं प्लानिंग वेगळं असेल, आम्ही काँग्रेस म्हणून आमची तयारी सुरू केलीय. विधानसभा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची तयारी सुरु झालेली आहे. राष्ट्रवादी आमचा मित्र पक्ष आहे त्यामुळे बसून काय निर्णय होईल ते बघू. परंतु आज आमच्या समोर त्यांचा कुठला प्रस्ताव नाही.”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल बुलढाण्याच्या दौऱ्यावर होते, दौऱ्याचा मुख्य उद्देश कोविड परिस्थितीचा आढावा घेण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र हा राजकीय गाठी भेटीचा दौरा असल्याचं स्पष्ट दिसत होतं. कोविड सेन्टरला पाच मिनिटांची भेट तर कार्यकर्त्यांचा मेळावा तीन तीन तास चालल्याने हा दौरा राजकीय असल्याचं स्पष्ट झालं. पटोलेंचा हा दौरा रात्री उशीरापर्यंत सुरुच होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्याची लगेच व्यवस्था होते

News Desk

शिवसनेने सत्तेच्या बदल्यात स्वाभिमान घरी गुंडाळून ठेवला, श्वेता महालेंची टीका

News Desk

शॉक लागून दाम्पत्य ठार

News Desk