HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या रिक्त जागेवर नाना पटोलेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई | राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नियुक्ती अद्याप झाली नसल्यानं त्यावरुन जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी सरकारकडून १२ जणांची नावं राज्यपालांकडे पाठवण्यात आली आहेत. पण राज्यापालांनी त्यावर अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेते राज्यपालांच्या या भूमिकेवर नाराज आहे. खुद्द शरद पवार यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या समित्या या संवैधानिक की असंवैधानिक आहेत, हे तपासावे लागेल, अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. विधिमंडळ कामकाजासाठी आपल्या सहीनं एकूण १६ कमिट्या तयार करण्यात आल्या आहेत. या कमिट्यांमध्ये राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत. जर या जागा रिक्त असतील तर त्या क्षेत्राच्या लोकांना न्याय मिळणार नाही. त्यामुळे या सर्व कमिट्या असंवैधानिक ठरु शकतात. जर कामकाज संवैधानिक नसेल तर या सर्व कमिट्या सरकारला रद्द कराव्या लागतील, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली आहे.

तसेच, नाना पटोले यांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीवरही भाष्य केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली येतायत ते पाहता किंमती कमी करून डिझेल २५ रुपये आणि पेट्रोल ३५ रुपये लिटर विकायला हवे होते. पण आता पेट्रोलचा दर १०० च्या वर गेला आहे. याचा अर्थ गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारला जातोय आणि मूठभर उद्योगपती मित्रांना फायदे पुरवले जात आहेत. भाजप याच पद्धतीने काम करेल तर काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असा इशाराही नाना पटोले यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली नवी तारीख जाहीर…!

News Desk

राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय ! राज्यात आजपासून डिजिटल शैक्षणिक वर्षाला सुरुवात

News Desk

पुजा चव्हाण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील शवविच्छेदन अहवालात छेडछाड?, आशिष शेलारांचा आरोप

News Desk