HW News Marathi
महाराष्ट्र

लक्षात ठेवा, ठाकरे सरकार काँग्रेसच्या टेकूवर, नाना पटोलेंचा शिवसेनेला रोखठोक इशारा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना खासदार संजय राऊत आणि महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात UPAच्या अध्यक्ष पदावरुन वाद सुरु आहेत. दरम्यान, नाना पटोले यांनी सेनेला आता एक इशाराच दिला आहे. संजय राऊत हे काँग्रेसच्या नेत्यांवर टीका करत असतील तर आम्हालाही विचार करावा लागेल. राज्यातील महाविकासआघाडी सरकार हे काँग्रेसच्या टेकूवर उभे आहे, ही बाब शिवसेनेने लक्षात ठेवावी, असा रोखठोक इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला. तसेच यूपीएच्या अध्यक्षपदासाठी संजय राऊत यांच्याकडून सुरु असलेली शरद पवारांची वकिली त्यांनी थांबवावी, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

ते आज (२७ मार्च) भिवंडीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी UPA चे अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे द्यावे, अशी मागणी करणाऱ्या संजय राऊत यांना चांगलेच फैलावर घेतले. संजय राऊत यांची वक्तव्य पाहता ते शिवसेनेचे की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत, असा प्रश्न पडला आहे. दिल्लीत यूपीए 2 स्थापन करण्याच्या हालचाली व त्यासाठी संजय राऊत यांनी शरद पवारांकडे यूपीएचे नेतृत्व सोपवावे, ही केलेली मागणी हास्यास्पद आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी पक्षात आहेत की शिवसेनेत हे तपासावे लागेल . तर संजय राऊत हे शिवसेनेचे नेते आहेत. ‘सामना’चे संपादक आहेत हे माहिती आहे. परंतु ते शरद पवारांचे प्रवक्ते झाल्यासारखे बोलत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

यंदाच्या २४ महिला आमदार विधानसभेत

News Desk

राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी वेतन

Aprna

सिनेमागृह सुरु करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार, संजय राऊतांचे वक्तव्य

News Desk