HW News Marathi
Covid-19

राहुल गांधींच्या भेटीसाठी नाना पटोले दिल्लीला जाणार, ‘हे’ आहे कारण

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे सुरू असलेल्या राजकीय जोरदार घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी नाना पटोले दिलेला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. “महाराष्ट्र सरकारमध्ये काँग्रेसला निर्णय घेण्याचे अधिकार नाही”, असे अत्यंत मोठे वक्तव्य राहुल गांधी यांनी आज (२६ मे) केले आहे. राहुल गांधींच्या ‘या’ वक्तव्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर नाना पटोले आता राहुल गांधींच्या भेटीसाठी दिल्लीला जाणार असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांनी आज (२६ मे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र काँग्रेसबाबत हे वक्तव्य केले आहे.

“महाराष्ट्रामधील सरकारला काँग्रेसने समर्थन दिले आहे. मात्र, महाराष्ट्रात काँग्रेसला निर्णय घेण्याइतके अधिकार नाही”, असे राहुल गांधी म्हणाले. “महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा जास्त आहे. राज्यात तुमचे सरकार आहे. काय सांगाल ?” असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता राहुल गांधींनी हे उत्तर दिले. “दाट लोकवस्ती असलेल्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग वेगाने होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील कोरोना रुग्ण संख्या जास्त आहे. महाराष्ट्रातील सरकारला आम्ही समर्थन दिले आहे. पण महाराष्ट्रात काँग्रेसला मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार नाही. आमच्याकडे पंजाब, छत्तीसगढ व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे”, असे राहुल गांधी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेमडीसिव्हीर इंजेक्शन रुग्णालयातून गायब झाल्याने त्याच्या चौकशीची गृहराज्यमंत्री शंभूराज यांची मागणी

News Desk

काँग्रेसनंतर राष्ट्रवादीचा पुढाकार ! मुख्यमंत्री सहाय्यता निधीला २ कोटींची मदत

News Desk

‘या’ कारणामुळे नवनिर्वाचित भाजपचे आमदार रमेश कराड यांच्यावर गुन्हा दाखल

News Desk