HW News Marathi
Covid-19

गेले ६ महिने कोरोना कुठे झोपला होता का? । सदाभाऊ खोत

मुंबई । राज्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने एकीकडे शासन-प्रशासनाची चिंता वाढलेली आहे. तर दुसरीकडे याच पार्श्वभूमीवर माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. “येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा आता बाऊ केला जातोय. कोरोनाचा बाऊ करूया आणि आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळुया असा राज्य सरकारचा विचार आहे”, असा गंभीर आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

सदभाऊ खोत राज्य सरकारवर टीका करताना म्हणतात की, “कोरोना वाढला आहे. ६ महिने कोरोना कुठे झोपला होता का? ६ महिने तुम्ही चाचण्याच घेतल्या नाहीत, असा याचा अर्थ होतो. आता अधिवेशन जवळ आले आहे. त्यात विरोधी आमदार जनतेचे प्रश्न मांडणार, आपल्याला तोंड द्यावे लागणार, म्हणून राज्य सरकार कोरोनाचा बाऊ करत आहे”, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे.

सदाभाऊ खोत यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त राज्य सरकारने लावलेल्या निर्बंधांवर देखील टीका केली आहे. “या सरकारसाठी ‘एकच प्याला’ या नाटकाचे वर्णन करावे लागले. हे सरकार दारुडे सरकार आहे. कोरोना काळात या सरकारने दारूतून जास्त कर मिळतोय म्हणून दारूची दुकाने सुरू केली आणि मंदिरे बंद ठेवली”, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टास्क फोर्समध्ये कोरोनाचा शिरकाव, टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

ठाकरे सरकारकडून ‘दिवाळी’साठीच्या मार्गदर्शक सूचना जारी, कशावर बंदी ? जाणून घ्या

News Desk

पतंजलीच्या कोरोनावरील औषधाच्या जाहिराती तातडीने थांबवा । आयुष मंत्रालय

News Desk