HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं, राणेंचा गंभीर आरोप 

कणकवली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी जोरदार टीका केली आहे. या दोघांनीही दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. या दोघांनाही शेतीतलं काय कळतं? असं विचारतानाच कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो, हे तरी यांना माहीत आहे का? असा सवाल भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना पाठिंबा देण्यासाठी आज भाजपने सिंधुदुर्गात ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केलं होतं.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. गेल्या सत्तर वर्षांमध्ये जे काँग्रेसला जमलं नाही. ते मोदींनी करून दाखवलं. ज्या काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी काहीही केलं नाही तिच काँग्रेस आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहे. शेतकऱ्यांना पिकवलेला माल विकायलाही बंधने होती. तोट्यात माल विकला जायचा. मेहनतीचा पैसाही त्यांना मिळत नव्हता. सत्तर वर्षातील हे नियम मोदींनी मोडून काढले. आज त्यालाच काँग्रेसने विरोध सुरू केला आहे, अशी टीका राणे यांनी केली.

काँग्रेसने काही दलालांना फूस लावून शेतकरी आंदोलन सुरू केलं आहे. काँग्रेसने दलालांना कामाला लावलं आहे. हे राजकीय आंदोलन आहे. त्यामुळे त्यात सेटलमेंट होईल असं वाटत नाही, असं राणे म्हणाले. राहुल गांधींना शेतीतलं काय कळतं. ते काय बोलतात हे त्यांना कळतं का? राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहेत, त्यांना शेतीतलं काय कळतं? कापूस उत्पादक शेतकरी आत्महत्या का करतो? हे तरी यांना माहीत आहे का? असा सवालही त्यांनी केला. भाजप शेतकऱ्यांसाठी विधायक कामं करत आहे. भाजपच शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, असंही ते म्हणाले. २६ जानेवारीला चिपी विमानतळ सुरू करणार असल्याचं शिवसेनेचे खासदार सांगत आहेत. त्यांचा आणि विमानतळाचा काय संबंध?, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री पुण्यात येणार नाहीत!

News Desk

“चौकशीची खूपच घाई असेल तर…”,समन्सला रश्मी शुक्लांचं उत्तर

News Desk

मुंबईतील रस्ते सुधारणा कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

Aprna