HW News Marathi
महाराष्ट्र

“मी गँगस्टर होतो मग मंत्री कसे केले?”, राणेंचा शिवसेनेला सवाल

मुंबई | | केंद्रीय मंत्री नाराय राणे यांना काल(२४ ऑगस्ट) कोर्टाने जमीन मंजूर केला आहे. त्यानंतर आज(२५ ऑगस्ट) नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी त्यांचं मत मांडलं आहे. मी गँगस्टर होतो, तर मग मुख्यमंत्री कसे केले?, शिवसेनेत सगळेच मंत्री गँगस्टर आहेत का?, असा थेट सवाल नारायण राणेंनी शिवसेनेला विचारलं आहे.

आताचे शिवसैनिक गँगस्टर आहेत का?

नारायण राणे यांना संजय राऊतांनी सामना अग्रलेखातून गँगस्टर म्हणून संबोधलं आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्यालाच आता राणेंनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. मी जर गँगस्टर होतो, तर शिवसेनेनं मला मंत्री का केलं?, मग शिवसेनेच मंत्री हे गँगस्टर आहेत काय?, असा सवालही राणेंनी विचारलं आहे.

शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं फक्त

नारायण राणे यांनी यावेळी एक किस्सा सांगत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. चिपळूणला झेंडो दाखवले. मी म्हटलं ठीक आहे भगवे झेंडे आहेत. शिवसैनिकांची प्रचंड गर्दी? 17 माणसं होती. मी मुद्दाम मोजली. त्यापुढे आम्ही गेलो. तिथे एका कोपऱ्यामध्ये आवाज बाहेर येत नव्हते तरी काढत होते. 13 माणसं. आमच्या घरावर किती आले ते मी मोजले नाहीत. पण पराक्रमी लोकांचे व्हिडीओ क्लीप मिळतील. आम्ही तिघंही मुंबईत नव्हतो. पोलिसांनी जे कारायचं ते केलं. तुम्हाला घरं नाहीत, मुलंबाळं नाहीत? एवढंच आठवणीत ठेवा. तुम्ही कोणी मला काही करु शकत नाही. तुमच्या कुठल्याच प्रक्रियेला मी घाबरत नाही. शिवसेना वाढली त्यामध्ये माझा मोठा सहभाग आहे. त्यावेळी आताचे कुणी नव्हते. अपशब्द बोलणारेही नव्हते. कुठे होते तेही माहिती नाही. म्हणून त्यांना आंदोलन करायचं ते करु दे. पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था पाहत राहावं, असा सल्ला राणे यांनी पोलिसांना दिला आहे.

शिवसेनेला मोठं करण्यात माझा हात मोठा

नारायण राणे यांनी आज(२५ ऑगस्ट ) पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी “शिवसेना मोठं करण्यात माझा मोठा हात आहे”, असं विधान त्यांनी केलं आहे. “शिवसेना जव्हा स्थापन होत होती तेव्हा माझा सगळ्यात मोठा हात होता. आताचे जे शिवसैनिक आहेत ते कुठे दिसत आहेत? मी कर्तृत्ववान आहे म्हणून मी आज इथे आहे, शिवसेनेचे नेते का नाही दिसत कुठे?”, असं नारायण राणे म्हणाले आहेत.

कसला पराक्रम?

शिवसैनिकांनी काल(२४ ऑगस्ट) नारायण राणेंच्या बंगल्याबाहेर आंदोलन केलं होतं. त्यालाच प्रत्युत्तर आजच्या परिषदेत नारायण राणेंनी केलं आहे. ते म्हणाले, “कसला पराक्रम करून आलेत हे, उलट मार खाऊन आलेत. त्यातली १२ जन आता दवाखान्यात ऍडमिट आहेत. हाच का तुमचा पराक्रम? हा पराक्रम केल्यावर तुम्हाला तुमच्या साहेबांकडून शाबासकी मिळाली असेल. त्यांना कितीही आंदोलनं करायची आहेत ती करू द्यात. मी घाबरत नाही. कितीही मोर्चे काढायचे आहेत ते काढू द्या, पोलिस त्यांच्या कडे लक्ष देताच आहेत, आम्ही कायद्याने चालणारी माणसं आहोत कायद्यानेच वागू”, असं ते म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे सरकारमधील मित्रपक्षाच्या नाराजीवर सूचक विधान 

News Desk

राज्यात कमाल तापमानात वाढ, मुंबईकर हैराण

News Desk

नांदेडच्या महापाैर शैलजा स्वामी यांनी ” नो व्हेईकल डे “अॅटोरिक्षातून साजरा केला

News Desk