HW News Marathi
महाराष्ट्र

नारायण राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका, शिवसेनेचा इशारा

मुंबई | राज्य सरकारने विरोधी पक्ष आणि इतर राजकीय नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी माझ्या जिवाचं काही बरं-वाईट झाल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असल्याचं भाजप नेते नारायण राणेंनी म्हटलं होतं. यावरून शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना टोला लगावला आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे तर केंद्रात त्यांच्या पक्षाचे सरकार आहे. मात्र कोणतंही सरकार असलं तरी राणेंना त्यांच्या मुलांपासूनच खरा धोका असल्याचं विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

निलेश आणि नितेश दोघेही गुंड प्रवृत्तीचे आहेत. निलेश राणेला मतदारांनी घरी बसवलं. नितेश राणेकडे चांगले गुण असल्यामुळे तो पुढे जाईल असं वाटत होतं. मात्र त्यांची गुंडप्रवृत्ती त्यांना घरात बसविल्याशिवाय राहणार नाही, असंही राऊत म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावर राणे कुटुंबाकडून काय प्रतिक्रीया येईल हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

”नितेश राणेंनी नवी मुंबईत एका व्यक्तीला १२ कोटींना गंडा घातला होता. या प्रकरणाची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती. या प्रकरणी फडणवीस हे नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते. पण नारायण राणे भाजपाला शरण गेले. त्यामुळे ती केस थांबली. आम्ही मनात आणलं, तर ती केस एका दिवसात ओपन होऊ शकते. ती केस ओपन झाली, तर दुसऱ्याच महिन्यात नितेश राणे तुरुंगात गेल्याशिवाय राहणार नाहीत,” असा इशारा राऊत यांनी दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दानवे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे माहित असेल, मुनगंटीवारांनी केली दानवेंची पाठराखण

News Desk

राजकारणातील वाद कुठे खरे असतात?- बच्चू कडू

News Desk

शक्ती कायदा जागृती समितीची स्थापना! – डॉ. नीलम गोऱ्हे

Aprna