HW News Marathi
महाराष्ट्र

“मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं”, राणेंचा शिवसेनाला खोचक टोला

मुंबई | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्या जनयात्रेची सुरुवात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला वंदन करून केली आहे. त्यानंतर शिवसेनेने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यावरून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. शुद्धीकरणासाठी ब्राह्मण लागतो. शिवसेनेकडे आहेत कुठे? आमच्याकडे मागायला हवा होता. आमच्याकडे खूप आहेत, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.

ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या

नारायण राणे यांनी शिवसैनिकांवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, ” ज्यांना गोमूत्र शिंपडायचं आहे त्यांना शिंपडून द्या. ते स्मारक दलदलित आहे. फोटो पण साहेबांचा नीट दिसत नाही. आधी स्वतःचं मन शुद्ध करा. येऊ देणार नाही असं म्हटलं पण आम्ही गेलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं. मी जर त्यांचा पुत्र असतो तर येऊच दिलं नसतं. आणि शुद्धीकरण करायला ब्राह्मण लागतात ते कुठे होते? आम्हाला सांगा आमच्याकडे ब्राह्मण आहेत, आम्ही दिले असते”, असा हल्लाबोल राणे यांनी केला आहे.

दलदलीत ते स्मारक

नारायण राणे पुढे बोलताना म्हणाले कि, “फक्ता गोमूत्रं आणि गोमूत्रं या एकाच विषयासाठी आलो आहोत का? मला कुणाला नमस्कार करावा वाटतो, कुणासमोर विनम्र व्हावं वाटतं हा माझा प्रश्न आहे. ते गोमूत्रं ज्यांना शिंपडायचं त्यांना शिंपडू द्या. ज्यांना प्यायचं त्यांना पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध आहे. ज्यांनी शिंपडलं त्यांना विचारा. काय दुषित झालं होतं. एवढं जर स्मारकाचा अभिमान असेल ना ते स्मारक ज्या स्थितीत आहेत. तिथे जाऊ शकत नाही. पँटवर करून मी आत गेलो. दलदलीत ते स्मारक आहे. राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे आहेत. अनेक स्मारकं मी पाहिलं. अत्यंत सुशोभित असतात. लॉन आहे. फुलझाडं आहेत. इथे काय आहे. इथे तर फोटोही साहेबांचा दिसत नाही. जे गोमूत्रं शिंपडायला आले ना त्यांनी जागतिक किर्तीचं स्मारक करण्याचा प्रयत्न करा. मग कारभार करा”, असं ते म्हणाले आहेत.

मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं

शिवसेनेने नारायण राणेंना स्मारक जवळ न येऊ देण्याचा इशारा दिला होता. यावर देखील राणे यांनी टीका केली आहे. “राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते. उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

आताची शिवसेना लाचारी करत आहे

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मुख्यमनातरी उद्धव ठाकरे यांची आज(२० ऑगस्ट) बैठक होणार आहे. यावर देखील त्यांनी भाष्य केलं आहे. “बैठकीबद्दल ऐकून आनंद वाटला. मी ३९ वर्षे शिवसेनाप्रमुखांसोबत होतो. त्यांची विचारधारा हिंदुत्वाची होती. त्यांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी सर्वकाही केलं. त्यांनी सत्तेच्या लोभासाठी हिंदुत्वाचा त्याग केला नाही. आताची शिवसेना लाचारी करत आहे. त्याचा एक भाग म्हणून आजची बैठक होत आहे”, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुजय विखेंनी रेमडेसिवीरचा साठा थेट दिल्लीतून आणला,राज्य सरकार काय करणार ?

News Desk

केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्याला अधिकार द्या, राष्ट्रवादीची मागणी

News Desk

‘उद्वव ठाकरेंना जे करायचयं ते करु दे, मला जे करायचयं ते मी करणार’, अटकेनंतर नारायण राणेंची प्रतिक्रिया

News Desk