HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री मराठा आरक्षणाविरोधात, त्यांना आज मनापासून आनंद झाला असेल, नारायण राणेंचे प्रहार

मुंबई | सुप्रीम कोर्टाने आज (५ मे) मराठा आरक्षण रद्द केलं. या निर्णयाने राज्य सरकारला मोठा धक्का बसला आहे. यावरुन भाजपकडून सरकारवर टीका सुरुच आहे. याच विषयावरून भाजप खासदार नारायण राणे यांनी ठाकरे सरकारला सुनावलं आहेच शिवाय मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्यावरही वैयक्तिक टीका केली आहे. मराठा आरक्षण रद्द झालं याला महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री कारणीभूत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

“मी शिवसेनेत अनेक वर्ष काम केलं आहे. त्यामुळे मला माहिती आहे की शिवसेना आणि शिवसेनेच्या नेत्यांना मराठा समजाला आरक्षण द्यायचं नव्हतं. त्यामुळे फक्त दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे अशी भूमिका उद्धव ठाकरे घेत आहेत. त्यांना आज मनापासून आज आनंद झाला असेल”, असा घणाघात नारायण राणे यांनी केला आहे.

“सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने मराठा समाजाला मोठा दुखद धक्का बसला आहे. मराठा समाजात मागासलेल्या लोकांना भारतीय घटनेनुसार आरक्षण देण्यात आलं होतं. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली त्याचवेळी संशय आला होता. तामिळनाडू आणि कर्नाटक दोन्ही राज्यात ५२ टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण आहे. मात्र मराठा आरक्षण रद्द करणे अत्यंत दुर्दैवी आहे”, असं भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

“मराठा आरक्षणासंदर्भातील लढा आजही संपलेला नाही. मराठा समाज लढा सुरु ठेवणार आहे. काही जण बाहेरुन आरक्षण देतोय असं दाखवत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, भारतीय राज्य घटनेनुसार आम्ही लढू आणि आरक्षण मिळवू”, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे असे, ट ला ट, फ ला फ, झ ला झ आम्हालाही लावता येते! राऊतांची शहांवर टीका

Aprna

आता शरद पवार अन् अजित पवार येतील कि काय ?

News Desk

राजकीय मतभेद बाजूला ठेवून शांत डोक्याने विचार केला तर…राऊतांचा फडणवीसांना सल्ला 

News Desk