HW News Marathi
महाराष्ट्र

“सचिन वाझेसोबत ओबेरॉयमध्ये येणारी ती बाई कोण?”, नारायण राणेंचा गंभीर सवाल

मुंबई | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात मिनी लॉकडाऊन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप नेते आणि खासदार नारायण राणेंनी राज्यात लॉकडाऊन लावण्यास विरोध दर्शवला आहे. तसेच सचिन वाझे प्रकरणावरून शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलाय. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन लॉकडाऊनपासून सचिन वाझे प्रकरणापर्यंत ठाकरे सरकारवर शरसंधान साधलं आहे. आजची (२ एप्रिल) पत्रकार परिषद लॉकडाऊन, कायदा सुव्यवस्था आणि भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांवर असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता

नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेंवरही गंभीर आरोप केलेत. महिन्याला 100 कोटी जमवायचे आणि अनिल देशमुखकडे नेऊन द्यायचे ही सचिन वाझेवर जबाबदारी होती, सचिन वाझे नेमका कोणासाठी काम करत होता. जनतेच्या सुरक्षेसाठी की मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पैसे पुरवण्यासाठी काम करत होता. एनआयएच्या चौकशीतून खरी गोष्ट लवकरच बाहेर येईल. युनूस या अतिरेक्याच्या हत्येतही वाझेचा समावेश होता. एक एपीआय सचिन वाझे ओबेरॉयमध्ये राहू शकतो. तो जिथे राहायचा त्या ओबेरॉयच्या कॅमेऱ्यामध्ये एका बाईचा फोटो आहे. ती भाईंदरला राहणारी आहे. एनआयएनं तिच्या भाईंदरच्या घरीही छापा मारला. ती बाई आणि ओबेरॉयमध्ये येणारी बाई सारखीच आहे. ती बाई वाझेसोबत कोणतं काम करत होती.

वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट

या सरकारला एवढे दिवस माहीत नव्हतं काय? वाझेचे किती फ्लॅट आहेत माहीत नाही, मध्यमवर्गीयांना साधी चाळीत रुम घेणं अवघड आहे. पण वाझेचे कुलाब्यापासून अख्ख्या मुंबईभर फ्लॅट आहेत. अशा माणसाला खात्यात घ्यायचं काम शिवसेनेनं केलंय. वाझेला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे. सुशांत सिंगपासून दिशा सालियानपर्यंत, पूचा चव्हाणपासून मनसुख हिरेनपर्यंत किती हत्या आहेत. एखाद्या गॉडफादरशिवाय पोलीस अधिकारी असं करूच शकत नाही. पोलीसच हत्या करत आहेत. किती पोलीस त्यात आहेत माहीत नाही.

रवी राणा काय म्हणाले होते?

“ज्याप्रकारे हिरेन यांचा मृत्यू झाला त्यानुसार सचिन वाझे यांच्या जीवालाही धोका आहे. ‘मातोश्री’ अडचणीत असून सचिन वाझेंच्या जीवाला धोका आहे. म्हणून मुंबई पोलिसांपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. एनआयने पूर्ण लक्ष ठेवून संरक्षण दिलं पाहिजे,” अशी मागणी रवी राणा यांनी केली आहे. “देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे,” असा दावा रवी राणा यांनी केला आहे.

ते म्हणाले आहेत की, “सचिन वाझेंनी तपासात एनआयएला जी माहिती दिली आहे त्यावरुन महाराष्ट्रात येणाऱ्या काळात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त परमबीर सिंग यांना बाजूला करुन हे प्रकरण संपणारं नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभोवती फिरत आहेत. सचिन वाझेंना प्लानिंग करण्यासाठी कोणी मदत केली हेदेखील लवकरच पुढे येईल”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात लाॅकडाऊन वाढवण्याबाबत जयंत पाटील म्हणतात …

Arati More

मला पार्टीचं निमंत्रण होतं, पण…!, अस्लम शेख यांचा खुलासा

Gauri Tilekar

“ज्या दिवशी सरकार पडेल तेव्हा आम्ही पर्यायी सरकार देऊ” – देवेंद्र फडणवीस

News Desk