HW News Marathi
Covid-19

पंतप्रधानांचा उध्दव ठाकरेंना फोन, रश्मी ठाकरेंच्या तब्येतीची केली विचारपूस

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोना रूग्ण संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे.रोनरीरदी यांनी आज (१ एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून ‘सामना’च्या संपादक सौ.रश्मी उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. तसेच, त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.

रश्मी ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. आधी त्या घरीच विलागीकरणात होत्या. मात्र, पुढील काही उपचारांसाठी त्यांच्यावर एच. एन. रिलायन्स रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्या उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून त्यांच्या तब्येतीत झपाटय़ाने सुधारणा होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच, मंत्री आदित्य ठाकरे यांनाही कोरोना झाला आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. काही वैद्यकीय चाचण्यांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रश्मी ठाकरे यांच्या आजारपणाचे वृत्त समजताच पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व रश्मी ठाकरे यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबईचे पालकमंत्री कोरोना पाॅझिटिव्ह’ ट्विट करत दिली माहिती

News Desk

केंद्र सरकारला घाबरायचं की त्यांच्यासोबत लढायचं ? हा निर्णय आपणच घ्यायचा !

News Desk

बीडमधील जनतेचा आगळे-वेगळा उपक्रम, बाहेरुन येणाऱ्यांचे वाजत-गाजत स्वागत करून घरातच क्वारंटाईन

News Desk