HW News Marathi
Covid-19

“मी दोनदा लस घेतली अन् जिवंत आहे बघा !” असे सांगत झिरवळ आदिवासी पाड्यांवर का फिरतायत ?

मुंबई । कोरोनाचा काळ मोठा आव्हानात्मक ठरतोय. त्याची अनेक प्रमुख, गंभीर कारणे आहेत. पण त्यासोबतच एक कारण आहे ते म्हणजे लोकांच्या मनात असणारे समज-गैरसमज. त्यातही आजाराने आपला अगदीच नाईलाज झाला तर आणि तरच वैद्यकीय उपचारासाठी तयार होणाऱ्या आदिवासी भागात कोरोनाने कहर चांगलाच वाढला आहे. त्यातच “कोरोनावरची दुसरी लस घेतली की, माणूस मरतो”, असा गैरसमजही इथे निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आदिवासींना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आणि त्यांच्या मनातील चुकीचे समज दूर करून त्यांना योग्य त्या उपचारपद्धतींपर्यंत पोहोचवण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे आता ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. “मी दोनदा लस घेतली अन् जिवंत आहे बघा !” असे सांगत झिरवळ सध्या आदिवासी पाड्यांवर फिरत आहेत.

आदिवासी बांधव हे मुळातच दवाखान्यात जायला पटकन तयार होत नाहीत. आताही आजारी पडल्यावर सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करायला अनेक जण नकार देताना दिसले. याचे कारण नरहरी झिरवळ यांनी शोधून काढल्यावर त्यांना कळलं की, “दवाखान्यात गेल्यावर ‘पॉझिटिव्ह’ काढतात, मग माणसाला लस देतात आणि मग तो माणूस मरुन जातो”, असा गैरसमज इथल्या लोकांमध्ये पसरलेला आहे. त्यावर उपाय म्हणून झिरवळ यांनी पहिल्यांदा गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांना लस टोचून घ्यावी अशा सूचना केली. हे पाहून आता या आदिवासी भागामध्ये हळूहळू लोक लसीकरणाला प्रतिसाद देताना पाहायला मिळत आहेत.

पाहा संपूर्ण व्हिडीओ :

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धक्कादायक ! बुलढाण्यात संग्रामपूरमध्ये ४७ जणांची ‘क्वारंटाईन पंगत’

News Desk

राज्यात आज १५ हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद

News Desk

अमित शाह श्वसनाच्या त्रासामुळे पुन्हा ‘एम्स’मध्ये दाखल 

News Desk