HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांचं सरकारवरील प्रभुत्व कमी झाल्याने आणि मला डावलल्यामुळे मी शिवसेना सोडली – नरेंद्र पाटील

सातारा | महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीवरील प्रभुत्व कमी झाल.मला मोकळ्या मनाप्रमाणे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावं म्हणून मी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला.माथाडी कामगार संघटनेच्या संघटनेची मीटिंग असो किंवा मराठा आरक्षण संदर्भाचा विषय असो यातून मला जाणीवपूर्वक डावलले जात होते, असे अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.

मराठा समाजाच्या आरक्षण समितीच्या अध्यक्षपदावरून बदलून एकनाथ शिंदेंना आणा अशी माझी भूमिका होती,मला जाणीवपूर्वक शिवसेनेकडून डावलण्यात येत होतं,त्यामुळे माझी घुसमट होत होती.त्यामुळेच मी भाजपात प्रवेश केला आहे असा खुलासा अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेत केवळ अनिल देशमुख हे अपघाताने आले असे म्हणता येणार नाही,मात्र हे महाविकास आघाडी सरकार हेच पूर्णपणे अपघातानेच आलेलं सरकार असल्याचा गंभीर आरोप नरेंद पाटील महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

सचिन वाझेला मुख्यमंत्री पाठीशी घालत होते,त्याच वाझेला NIA ने कोठडीत केली.सर्व पोलीस यंत्रणेमध्ये कशा पद्धतीने भ्रष्टाचार होतो हे उघड होऊ लागलं आहे.या महाविकास आघाडीच पोलीस विभागावर योग्य नियंत्रण नसल्याचा आरोप नरेंद पाटलांनी महाविकास आघाडी सरकारवर केला आहे.

आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिवसेनेचे नेते नरेंद्र पाटील यांनी अखेर शिवसेनेला अखेर जय महाराष्ट्र केला. दरम्यान त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा देखील साधला आहे. त्याचबरोबर आपण यापुढे भाजप पक्षासाठी काम करणार असून आमचे नेते देवेंद्र फडणवीस सांगतील तेव्हा पक्ष प्रवेश करेन असेही नरेंद्र पाटील यांनी स्पष्ट केले.

आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे होते – नरेंद्र पाटील

दरम्यान, पुढे नरेंद्र पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी, मी राष्ट्रवादीत असताना देखील माझी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर नियुक्ती केली होती. त्यांच्या सांगण्यावरुन मी शिवसेनेकडून खासदारकीही लढवली होती. आपल्या पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करायला हवे होते. मात्र त्यांनी महामंडळ बरखास्त केले, असं माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Maharashtra Budget 2021-2022 : राज्यात कृषीपंप जोडणी धोरण राबवणार, महावितरणला १५०० कोटी रुपये प्रस्तावित

News Desk

नारायण राणे, उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार!

News Desk

संजय राऊतांच्या बोलण्यातून ‘चोराच्या मनात चांदणं’ दिसतंय – चित्रा वाघ

News Desk