HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिक मनपा निवडणूक अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढणार!

नाशिक। नाशिक महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर मनसेने आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. नाशिक महापालिका निवडणूक अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवणार असल्याची घोषणा मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे. त्यामुळे नाशिक पालिका निवडणूक मनसेने अधिक महत्वपूर्ण घेतलाच चित्र आहे.

महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात

संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी बोलताना ही मोठी माहिती दिली. अमित ठाकरे आणि संदीप देशपांडे यांनी आज नाशिक पालिका आयुक्तांची भेट घेतली. आम्ही नाशिक महापालिका स्वबळावर लढणार आहोत. महापालिका निवडणुका अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात लढवल्या जाणार आहेत, असं देशपांडे म्हणाले.

रस्त्यातील खड्डे बुजवले नाही तर त्या अभियंत्यांना खड्ड्यात मनसे बसवेल

नाशकात तयार झालेल्या प्रकल्पांची अमित ठाकरे यांनी पाहणी केली. काही ठिकाणी या प्रकल्पांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. त्यामुळे मनसेच्या काळातील या प्रकल्पांची राजकारण बाजूला ठेऊन सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी पालिका आयुक्तांना केली आहे. पालिकेच्या इंजीनिअर्सनी रस्त्यातील खड्डे बुजवले नाही तर त्या अभियंत्यांना त्याच खड्ड्यात मनसे बसवेल, असा इशाराही त्यांनी दिला.

कलाकारांना दुय्यम वागणूक मिळते

सत्ताधारी भाजपं, मनसेचे प्रकल्प स्मार्ट सिटी म्हणून दाखवते. मनसेच्या कामावर भाजपची पोळी भाजली जात आहे, असा आरोप करतानाच कामगारांना कोविड भत्ता मिळायला हवा. कालिदास रंगमंदिरात कलाकारांना दुय्यम मागणी मिळते आहे याकडे आयुक्तांचं लक्ष वेधल्याचं त्यांनी सांगितलं.

देशपांडे यांनी राऊत यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली

उद्धव ठाकरे यांनी देशाचं नेतृत्व करावं, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संदीप देशपांडे यांनी राऊत यांच्या या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. राऊत काहीही बोलतात. मुख्यमंत्री जिथे कोयनाला पोहोचत नाहीत, तिथे दिल्लीत काय पोहोचणार?, असा सवालही त्यांनी केला आहे.

राज ठाकरे यांची भूमिका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याने दोन्ही पक्षाची युती होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राज ठाकरे यांनी आपण चंद्रकांत पाटील यांना भाषणाच्या क्लिप पाठवल्याच नसल्याचा दावा केला आहे. तसेच माझ्या स्पष्ट असतात, मी भूमिका बदलत नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना 100 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर राज यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी ही भूमिका मांडली. भाजपसोबत मनसेची युती होणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. तुम्हीच प्रश्न निर्माण करता आणि आम्हाला उत्तर विचारता. मी चंद्रकांत पाटील यांना क्लिप पाठवली नाही. मी बोललो होतो क्लिप पाठवेल. त्यांना कोणी पाठवल्या माहीत नाही. त्यांना याबाबत विचारणार आहे. माझं भाषण हिंदीत होतं. ते हिंदी भाषिकांना आवडलं. तुम्हाला कळलं नसले तर तुम्हाला पाठवतो. असं मी चंद्रकांत पाटील यांना म्हणालो होतो. त्यावर, मला पाठव. माल नक्की ऐकायला आवडेल, असं ते म्हणाले होते. त्यानंतर मुंबईत आल्यावर मी एकदोन जणांशी याबाबत बोललो होतो. त्यापैकी एकाने पाठवली असेल की नाही ते विचारतो, असं राज ठाकरे म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमदार रोहित पवारांनी घेतली केंद्रीय मंत्री गिरीराज सिंग यांची भेट!

News Desk

IAS ऑफिसर्स वाईव्ज असोसिएशनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १.७५ लाखांची मदत

News Desk

देशात ओमायक्रॉनचा दुसरा बळी; कोणतीही विदेशवारी न करता महिलेने गमावला जीव

Aprna