HW News Marathi
महाराष्ट्र

नवी मुंबईतील शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांनी दिले राजीनामे

नवी मुंबई | विधासभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे दिले आहे. शिवसैनिकांच्या राजीनाम्यामागे कारण म्हणजे नवी मुंबईतील बेलापूर आणि एरोली हे मतदार संघ भाजपला गेल्याने नाराज शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामे दिले आहे.

यामध्ये नवी मुंबईतील शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, शहरप्रमुख आणि विभाग प्रमुखांचा समावेश आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नमकी काय भूमिका घेणार याकेड सर्वांचे लभ लागेल आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना आणि भाजपची युती होणार असल्याची माहिती परिपत्रकाद्वारे देण्यात आली असून युतीच्या जागावाटपाची घोषणा लवकरच करून असे यापत्रत नमुद करण्यात आले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असे वचन मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिले असल्याचे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी शनिवारी (२८ सप्टेंबर) मुंबईत पार पडलेल्या मेळाव्यात केले होते.

गणेश नाईक यांच्या उमदेवारीवरून नाराज शिवसैनिक

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील बेलापूर विधानसभा मतदार संघातून भाजप गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत. बेलापूर विभागाचे शहरप्रमुख विजय माने यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर…रोहित पवारांचे चिराग पासवान यांना पत्र 

News Desk

मराठा आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी होणार

News Desk

मुख्यमंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका

News Desk