HW News Marathi
महाराष्ट्र

“हवंतर बाळासाहेबांचं नाव द्या पण ते काम पूर्ण करा”

देशातील पहिल्या स्कायवॉक निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं आहे. परंतू त्याच काम सध्या अर्धवट स्थितीतच पडलेलं आहे. यावरून आमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे.

चिखलदऱ्याला हजारो पर्यटक दरवर्षी या ठिकाणी निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र याठिकाणी हातात घेण्यात आलेला सिंगल केबलचा स्कायवॉक अर्धवट स्थितीत आहे. आदित्यजी आपण पर्यटन मंत्री आहात. मुंबई, ठाणे, कोकणामध्ये ज्या प्रकारे विकास करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतला. जरा विदर्भाकडेही लक्ष द्या, असं नवनीत राणा यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

*हवं तर बाळासाहेबांच नाव द्या पण काम पूर्ण करा*

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव समृद्ध महामार्गाला दिलं आणि जलद गतीने त्या महामार्गाचे काम केलं जात आहे. तसेच चिखलदऱ्याच्या प्रकल्पालाही बाळासाहेबांच नाव द्यायला देखील आमची काहीच हरकत नाही, परंतू त्या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावं, अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे आदित्य ठाकरेंना केली आहे.

स्कायवॉक या प्रकल्पाचे काम पूर्ण झालं तर चिखलदऱ्याच्या पर्यटन विकासाचा हा एक टर्निंग पॉईट ठरू शकतो, असंही नवनीत राणा आपल्या पत्रामध्ये म्हणाल्या आहेत. तसेच आदित्यजी ठाकरे यांनी लवकारात लवकर या प्रकल्पाचं काम पूर्ण केलं. तर आदिवासी महूळ बेळघाट, चिखलदऱ्याला न्याय, तेथील गोरगरीब आदिवासींना वाढणाऱ्या पर्यटनातून रोजगारीची चांगली संधी मिळेल, अशी अपेक्षाही नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

MBBS च्या परीक्षा जुन महिन्यात होणार!

News Desk

राज्यातील शेतकऱ्यांचे २ लाखांपर्यंतचे कर्ज माफ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

News Desk

‘बलात्कार प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा’, नवाब मालिकांची गृहमंत्र्यांकडे मागणी

News Desk