HW News Marathi
महाराष्ट्र

मराठवाड्यातील खरीपाच्या पिकांना नवसंजीवनी

औरंगाबादः मागील 45 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने रविवारी सर्वदूर हजेरी लावून खरीप पिकांसह रब्बी हंगामातील पाण्याची समस्या दूर केली आहे. मराठवाड्यातील 32 तालुक्यात एकाच दिवशी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. सुमारे पाच जणांचा यात बळी गेला असून हजारो हेक्टरवली पिके वाहून गेली आहेत. मराठवाड्यालगतच्या अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली. पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र होते. पैठण तालुक्यात एका बालकाचा डबक्यात पडून मृत्यू झाला तर गंगापूर तालुक्यात तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान पावसाने जायकवाडीच्य पाणीसाठ्या मोठी वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातून मोठ्या प्रमाणात जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आले असून जायकवाडीचा साठा लवकरच साठ टक्क्यांच्या घरात पोहोचण्याची शक्यात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खासदार मोहन डेलकर यांचा मुंबईतील हॉटेलमध्ये आढळला मृतदेह

News Desk

Raj Thackeray ED Case | चौकशी झाली म्हणजे अटक होईलच असे नाही !

News Desk

BMC शिवसेनेकडे आहे, ही हुकूमशाही चांगली नाही – नवनीत राणा

News Desk