HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसनंतर राष्ट्रवादी निर्णय देणार | नवाब मलिक

मुंबई | राज्यातील सत्तास्थापनेविषयी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकमताने निर्णय देणार, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष नवाब मलिक यांनी राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीने विधानसभा निवडणुका लढल्याने एकत्र निर्णय घेऊ, अशी माहिती मलिक यांनी दिली आहे. काँग्रेसच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी निर्णय घेणार असल्याचे मलिक म्हणाले.

मलिक पुढे असे देखील म्हणाले की, “काँग्रेस-राष्ट्रवादीची एकच भूमिका,” असणार असे देखली ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला जाणार नसल्याचे देखील मलिक यांनी माध्यमांना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसने आज (११ नोव्हेंबर) सायंकाळी ४.३० वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांचा निर्णय स्पष्ट करणार असल्याचे स्पष्ट करणार असल्याचे मलिक यांनी पत्रकरांना सांगितले.

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा करण्यासाठी कॉँग्रेस कार्यकारणीची बैठक बोलविली होती. राज्यातील नेत्यांची भूमिका जाणून पक्षश्रष्ठी सायंकाळी ४ वाजता पुन्हा एकदा बैठक बोलवून काँग्रेस निर्णय सांगणार असल्याचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच यामध्ये जयपूर येथे असलेल्या राज्यातील काँग्रेस आमदारांनी कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्याची एकमताने मागणी केली आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोथरुड मध्ये चंद्रकांत पाटील अपघातातून बचावले!

News Desk

“बिर्याणीसाठी पैसे कशाला द्यायचे?”; ‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे पुणे पोलीसांत खळबळ

News Desk

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून पार्थ पवार यांच्या उमेदवारीचे वृत्त निराधार

News Desk