HW News Marathi
महाराष्ट्र

“आतातरी केंद्राने हट्टीपणा सोडत चुका मान्य कराव्यात”, राष्ट्रवादीचा कृषी कायद्यावरुन सल्ला

मुंबई | केंद्राने लागू केलेल्या ३ कृषी कायद्यांना सुप्रीम कोर्टाने अंतरिम स्थगिती दिली आहे. सुप्रीम कोर्टाने हा मोदी सरकारला धक्काच दिल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, या निर्णयावरुन राजकीय वर्तृळातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

नवाब मलिक यांनी ट्विट करत असे म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे. आणि केंद्र सरकारने आता हट्टीपणा सोडवा आणि आपल्या चुका मान्य करुन त्या सुधाराव्यात, असा सल्लाही नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला कृषी कायद्यांच्या संदर्भात दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शेतकरी आंदोलनाबाबत आज मोठा निकाल जाहीर केला. सुप्रीम कोर्टाने आज केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला पुढील आदेशापर्यंत तात्पुरती स्थगिती दिली आहे. यासोबतच कोर्टाने चार सदस्यीय समितीचीही स्थापना केली आहे. यामध्ये कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी, हरसिमरत मान, प्रमोद जोशी आणि अनिल धनवट यांचा समावेश केला आहे.

सरन्यायाधीश एस ए बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी करताना कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली. सोबतच समिती स्थापन केली. ही समिती सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये कायद्यांवर सुरु असलेला वाद समजून घेईल आणि सर्वोच्च न्यायलयाला अहवाल सोपवेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला – अजित पवार

News Desk

रेमेडिसेव्हिर इंजेक्शनचा जळगावात मोठ्या प्रमाणात तुटवडा, लवकर पुरवठा करा – गिरीश महाजन  

News Desk

मुंबईत पावसाचा कहर चेंबूरमध्ये घरांवर संरक्षक भिंत कोसळली, 14 जणांचा मृत्यू!

News Desk