HW News Marathi
महाराष्ट्र

“राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा” – नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस राजकारणात आल्यानंतर जातीजातीमध्ये तणाव निर्माण झाला असे वक्तव्य मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते त्या वक्तव्याला नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. या देशात मनुवादी व्यवस्थेमुळे वर्णव्यवस्था निर्माण झाली आणि त्याअंतर्गत जातीव्यवस्था उभ्या राहिल्या. मात्र यामुळे जातीआधारावर अनेक वर्षे लोकांवर अन्याय होत राहिला हे राज ठाकरे यांना बहुतेक माहीत नसावे असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!”

News Desk

Hasan Mushrif Exclusive : राज्यभरात शिवसेना-भाजपची डाळ गळणार नाही !

News Desk

केंद्राने कायदे मंजुर करताना विरोधकांना विश्वासात घ्यायला हवं होतं, पवारांचा सल्ला   

News Desk