HW News Marathi
महाराष्ट्र

आता भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे – नवाब मलिक

मुंबई | ४५ वर्षांनंतर राहुल गांधी यांनी कुठेतरी आणीबाणी ही चूक असल्याचे मान्य केले आहे. आता भाजपनेही गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.विधानभवनाच्या मिडिया हाऊस येथे मंत्री नवाब मलिक यांनी ही मागणी केली आहे.

जर कॉंग्रेस चूक सुधारण्याचा प्रयत्न करत आहे तर भाजप केव्हा चूक सुधारणार याची माहिती जनतेला द्यावी. दिल्ली दंगलीबाबत काँग्रेसने माफी मागितली होती, आता गुजरात दंगलीबाबत भाजपने माफी मागावी असेही नवाब मलिक म्हणाले आहेत.

काय म्हणाले राहूल गांधी?

‘माझ्या मते ती एक चूक होती. त्यावेळी जे घडलं ते नक्कीच चूक होतं. पण, आजच्या काळात जे घडत आहे ते एकदम वेगळं आहे. त्यावेळी काँग्रेसनं संस्थात्मक पाया ताब्यात घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाचा असलेला लोकशाही गाभा त्याला परवानगी देत नाही. आमची तसं करण्याची इच्छा असेल तरी आम्ही ते करु शकत नाही.’

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रदेश काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या प्रदेशाध्यपदी उमाकांत अग्निहोत्री यांची नियुक्ती

Aprna

शिवसेना विधानपरिषद निवडणूक स्वबळावर लढवणार

News Desk

“महावेध” प्रकल्पाकडे महाराष्ट्र कृषी विभागाचे दुर्लक्ष

Adil