HW News Marathi
देश / विदेश

“२०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आता हे कुणाचं नशीब ?” नवाब मलिक

मुंबई | राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पेट्रोलच्या वाढत्या दरांवरून मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. “देशाचे प्रधानसेवक २०१५ मध्ये असे सांगत होते कि, माझ्या नशिबाने जर पेट्रोलचे भाव कमी झाले असते तर चांगलं झालं असतं. परंतु २०२१ मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली. आता हे कुणाचं नशीब आहे”, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. तसेच जगभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतातच दर का वाढवले जात आहेत हे देखील मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी यापूर्वी केली होती.

इंधन दरवाढीचा धागा पकडत नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींना २०१५ मधील त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे. २०२१ मध्ये पेट्रोलने शंभरी गाठली मग हे नशीब कुणाचे अशा आशयाचे ट्वीट करत नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर २०१५ मध्ये बोलणारे मोदी २०२१ मध्ये काहीच बोलत नाही. त्यामुळे शेवटी काय ‘बदनसीब जनता’ असे ट्वीट करत आणि व्हिडीओ शेअर करत नवाब मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाने राफेल कागदपत्रे चोरी प्रकरणाचा निर्णय ठेवला राखून

News Desk

अयोध्या प्रकरणात मध्यस्थीची नेमणूक करायची की नाही, यावर सर्वोच्च न्यायालायत सुनावणी

News Desk

आता तेजस एक्सप्रेसचा वेग आणखी वाढणार

Gauri Tilekar