HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्र सरकार देशात हळूहळू आणाबाणी आणतयं,मेट्रो कारशेड वादात सुप्रिया सुळे भडकल्या …

मुंबई | मेट्रो कारशेडच्या जागेवरुन आता केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला आहे. आता या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य आहे. मिठागराची ती जागा राज्य सरकारचीच आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे एखाद्या राज्यातील जमिनीवर पहिला अधिकार हा त्या राज्याचाच असतो, असं सांगतानाच केंद्र सरकार सातत्याने राज्याचे अधिकार काढून देशात हळूहळू आणीबाणी आणत आहे, असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

सु्पिया सुळे असं म्हणाल्या की, “खरं तर एक धक्कादायक गोष्ट केंद्र सरकारकडून कळली आहे. ही जमीन महाराष्ट्राची आहे. आणि कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते त्याचाच त्यावर अधिकार असतो. आणि यातुन केंद्र सरकारने नवीन काहीतरी काढलं आहे. म्हणजे ज्या राज्यांचे अधिकार आहेत ते काढून घेण्याचे पाप केंद्र सरकार करत आहे. त्यांच्या कृतीतून ते दिसत आहे. महाराष्ट्राच्या विकासामध्ये केंद्र सरकार हस्तक्षेप करत आहे हे निंदनीय आहे. तसेच, विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की, ती जमीन महाराष्ट्रातली आहे. त्यावर महाराष्ट्राच्या विकासासाठी काम होत आहे. कोणासाठी म्युझियम बांधले जात नाही आहे. मग केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला आहे. केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारचा इतका द्वेष का करत आहे हे माहित नाही”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रत्नागिरी, रायगडातील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची तातडीची बैठक

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणावर धर्मगुरुंच्या साक्षीने अखेर संजय राठोड बोलणार ?

News Desk

अनिल देशमुखांची ईडीविरोधात हायकोर्टात याचिका!

News Desk