HW News Marathi
महाराष्ट्र

राजकारणामध्ये खालच्या पातळीला जाऊन टीका करणे योग्य नाही !

मुंबई | आज राजकारणामध्ये अशा प्रकारे खालच्या पातळीला जावून टीका करणे योग्य नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जाखेडचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त करत त्यांनी भाजपचे नवनिर्विच आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केले आहे. रोहित पवार पुढे म्हणाले, “गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही पातळी सोडून केलेली आहे. शरद पवार यांच्यार केलेली टीका लोकांनाही आवडलेले नाहीच, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनाही आवडलेले नाही. पडळकर यांच्या पक्षातील विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांचे वक्तव आवडलेले नाही आणि त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. आज राजकारणात खालच्या पातळीची टीक करणे योग्य नाही,” असे ते म्हणाले.

दरम्यान, रोहित पवार म्हणाले, “शरद पवार यांना राजकीय आणि सामाजिक अनुभव मोठा आहे. म्हणून अशा पातळीवर जावून टीका करणे, अयोग्य आहे, असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. पडळकरांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्या मागे फडणवीस आहेत का, या प्रश्नावर बोलताना रोहित पवार म्हणाले, “शरद पवार यांच्या टीका करण्यामागे राजकीय खेळी काय आहे हे खरे सांगता येणार नाही. आजच्या कोरोनाच्या काळात जेव्हा लोक आडचणीत आहेत. आर्थिकदृष्टीने सुद्धा आपल्याला अजून खूप काम करायचे आहे. सध्या देश अडचणीत असताना काही लोकांना राजकारण सुचत असेल, तर मला योग्य वाटत नाही आणि लोकांनाही ते योग्य वाटत नाही, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडली आहे.”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेस ३० जानेवारीला नागपूर पोलीस आयुक्तांना ‘जनरल डायर’  पुरस्कार देणार!

News Desk

महाविकास आघाडीने सत्तेचा पुरेपूर वापर केला, तरीही…पाटलांची पहिली प्रतिक्रिया

News Desk

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna