HW News Marathi
महाराष्ट्र

शिवसेना-भाजपच्या यात्रा ‘मुख्यमंत्री’ पदासाठी !

जुन्नर | राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात आज (६ऑगस्ट) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू शिवस्वराज्य यात्रेला प्रारंभ झाली आहे. ‘शिवसेना आणि भाजपच्या यात्रेमध्ये कुणी ना कुणी मुख्यमंत्रिपदावर दावा करत आहे. मात्र, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ही छत्रपतींच्या मावळ्यांनी रयतेचा आवाज बुलंद करण्यासासाठी काढण्यात आलेली यात्रा आहे. शिस्वराज्य यात्रेमुळे पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचाच असेल,’ असा दावा करत कोल्हे यांनी यात्रेदरम्यान केला आहे.

यात्रेदरम्यान पक्षाला गळती लागलेली नाही. वरती काही झाले तरी खालच्या विटा मजबूत असल्याने फार फरक पडत नसल्याचा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. कोल्हे पुढे असे देखील म्हणाले की, “मुख्यमंत्र्यांच्या शहरातील नगारिकच सुरक्षित नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील राज्य निर्माण व्हावे म्हणून ही यात्रा काढण्यात आल्याचे सांगितले. ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्टला राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे. या यात्रेचा समारोप रायगड किल्ल्यावर २८ ऑगस्टला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढणार, आरोग्यमंत्र्यांचे संकेत

News Desk

अजित पवारांना पुन्हा झटका; मावस भावाच्या घरावर ED ची छापेमारी

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या पायगुणाने आता फक्त Dinosour आणि Alien दिसायचे राहिले, निलेश राणेंचा प्रहार! 

News Desk