HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादी घरवापसी अभियान सुरू करत भाजपला देणार का मोठा धक्का?

मुंबई | सध्या राजकीय वातावरण वेगवेगळ्या चर्चांनी रंगू लागले आहे. या पक्षातले आमदार त्या पक्षात जाणार किंवा हे आमदार आमच्या संपर्कात आहेत. असे अनेक दावे मंत्र्यांकडून केले गेले. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी भाजपमध्ये गेलेले आमदार पुन्हा राष्ट्रवादीत येण्यासाठी आतूर असल्याचे विधान केले होते. त्यानंतर पुन्हा एकदा राज्यात राजकीय चर्चा सुरु झाल्या. त्यातच आता राष्ट्रवादीचे घरवापसी अभियान सुरु होणार असल्याची माहिती देखील मिळत आहे.

भाजपमध्ये गेलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात काल (१२ ऑगस्ट) शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झालेल्या बैठकीत याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील तीनही पक्षाचं राजकारण, पक्षाची ताकद पाहून पक्ष सोडून गेलेल्यांना पुन्हा प्रवेश दिला जाणार आहे.

गयारामांना प्रवेश देण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांचा प्रवेश करून घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. दरम्यान, या सर्वात शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे देखील सूत्रांनी म्हटले आहे. कारण सध्याचे सरकार हे तीन पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे एकमेकांना सांभाळून, सर्व बाबी सांगून चालणे गरजेचे आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘महाराष्ट्र माझा’ छायाचित्र स्पर्धा उपक्रमात सहभागी व्हा

News Desk

भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाईंना पोलिसांनी घेतले ताब्यात 

News Desk

सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार! – मुख्यमंत्री

Aprna