HW News Marathi
महाराष्ट्र

पवारांनी सांगितले… २०२४ मध्ये उध्दव ठाकरेच मुख्यमंत्री असतील! – जितेंद्र आव्हाड

मुंबई | “२०२४मध्ये उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होती,” असा गौप्यस्फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. आव्हाडांनी नवी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना म्हटले. यावेळी २०२४ला पुन्हा महाविकासआघाडीचे सरकार येईल. आणि उद्धव ठाकरेच परत मुख्यमंत्री होती, असा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी व्यक्त केल्याचे आव्हाडांनी सांगितले. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीवरून आव्हाडांनी शिवसेनेवर टीका केली आहे

“ज्या पद्धतीने पवारसाहेबांनी तसे बघायला गेले तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फार अंतर नाही. ५६-५६चे अंतर आहे. पवारसाहेबांनी पुण्यामध्ये आपल्या मित्र परवा बोलताना सांगितले. हे मी खाजगीतले सांगतोय २०२४ला सुद्धा महाविकासआघाडीचे सरकार येईल. आणि उद्धव ठाकरेलाच परत मुख्यमंत्री करेल.”

“वॉर्ड रचेनेचे काम स्वतंत्र्यरित्या निवडणूक आयोगाने करावे. आणि निवडणूक आयोगाने नाकाशा जाहीर करावा. तिथून कच्चा नकाशा पाठवायचा आणि मग आम्ही पक्का करून. काही कोणी पक्काबिका करायचा नाही. जो नकाशा जसा आलाय तसाच पब्लिश करा. हे आम्ही मागच्या वेळेस ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीत बघितले. तेव्हा आम्ही शिवसेना बरोबर नव्हतो. पण शिवसेना हवे तशे वॉर्ड ठाणे महागरपालिकेत पाडून घेते हे आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितले,” असे आव्हाड म्हणाले.

संबंधित व्हिडिओ

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळेला 18 मेपर्यंत पोलीस कोठडी

Aprna

राज्यसरकारने प्रयत्न केले असते तर सुप्रीम कोर्टाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पण निर्णय द्यावा लागला असता

News Desk

उल्हासनगरात मुस्लिम समाजाचं कब्रस्तानासाठी उपोषण

News Desk