HW News Marathi
देश / विदेश

पार्थ पवारांची ‘ती’ भूमिका व्यक्तिगत, आमचा मुंबई पोलिसांवर पूर्ण विश्वास !

मुंबई | सर्वोच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सुपूर्द करण्याचा निर्णय दिला. त्यानंतर, थोड्याच वेळात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत पार्थ पवारांनी “सत्यमेव जयते”, असे ट्विट केले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एखादी व्यक्ती जेव्हा ट्विट करते तेव्हा ते त्यांचं व्यक्तिगत मत असतं”, असे म्हणत आमदार रोहित पवारांनी पार्थ पवारांच्या ट्विटवर स्पष्टीकरण दिले आहे. त्याचप्रमाणे, “मुंबई पोलिसांवर मला पूर्ण विश्वास आहे. मात्र, विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचे नाव खराब होत आहे”, असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

“विरोधक सुशांत सिह राजपूत प्रकरणावरुन निव्वळ राजकारण करत आहेत. यावरून विरोधक फक्त विरोधाला विरोध करत आहेत. सध्या शिक्षण आणि आरोग्य हे महत्त्वाचे विषय आहेत. यावर चर्चा होणे अधिक गरजेचे आहे. विरोध करायचा म्हणून करणं हे कितपत योग्य आहे ? सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला. मात्र, विरोधकांच्या या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचे नाव खराब होत आहे. माझी गोष्ट सोडाच पण हे कोणत्याही व्यक्तीला आवडणार नाही”, असे म्हणत रोहित पवारांनी या प्रकरणावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. दरम्यान, या सुशांतसिंह प्रकरणावरून विरोधकांवर महाराष्ट्र सरकार, मुंबई पोलिसांसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनामुळे पालक गमावलेल्या मुलांसाठी मोफत शिक्षण, दरमहा स्टायपेंड, १०लाखांची मदत, केंद्राची घोषणा!

News Desk

हार्दिक पटेल यांना न्यायालयाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

News Desk

सोशल मीडिया भाजपचे ऑक्सिजन, तर ही नळी मोदी फेकून देतील हे अशक्यच !

swarit