HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या हाकणे बंद करावे !

मुंबई | “फडणवीस सरकार राज्यातील पूरस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी उंटावरून शेळ्या हाकणे बंद करावे”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली आहे. “मुख्यमंत्री फडणवीस यांना राज्यातील पूरस्थितीपेक्षा महाजानदेश यात्रेची चिंता आहे”, असा आरोपही रुपाली चाकणकर यांनी केला आहे. रुपाली चाकणकर या कोल्हापूर आणि सांगलीतील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

“मुख्यमंत्र्यांना राज्यात निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीपेक्षाही आपला महाजनादेश यात्रेची चिंता अधिक आहे. त्यांनी जर गेल्या ५ वर्षांमध्ये जनतेसाठी निर्णय घेतले असते तर आता त्यांच्यावर यात्रा काढण्याची वेळ आली नसती. राज्य पूरस्थितीचा सामना करत असताना मंत्री गिरीश महाजन सेल्फी काढण्यात व्यस्त होते. तर पंकजा मुंडे त्या भागांत कुठेही फिरकल्या नाहीत. राज्यातील जनता आता त्यांना धंदा शिकवेल”, असे रुपाली चाकणकर यावेळी म्हणाल्या.

राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना बसला. दरम्यान, या जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरस्थितीमुळे येथील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गेल्या २ दिवसांपासून या भागातील पाणी हळूहळू ओसरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, या पूरग्रस्तांना सर्व स्तरांतून, सर्व क्षेत्रांतून मोठ्या प्रमाणात मदत पोहोचत आहे. मात्र, या भीषण पूरस्थितीबाबत राज्य सरकारने दाखवलेली असंवेदनशीलता, एकूण सरकारची याविषयीची भूमिका यावर गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर टीका होता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी संपाची तीव्रता अधिक वाढली

News Desk

अखेर तारीख ठरली, MPSCची परीक्षा २१ मार्चला होणार

News Desk

राज्यातील शाळा कधी सुरू होणार? शालेय मंत्र्यांनी दिली माहिती

News Desk