HW News Marathi
महाराष्ट्र

व्यंगचित्राच्या कुंचल्यातून राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी केंद्राला फटकारले…

मुंबई | केंद्रातील मोदी सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यामुळे बळीराजा रडकुंडीला आला आहे मात्र या बळीराजाची कीव अखेर कांद्याला आलीय आणि तोच कमलाबाईला ‘माझ्या बळीराजाला रडवू नकोस’ असे सांगत आहे अशा आशयाचे व्यंगचित्र काढून केंद्रसरकारच्या चुकीच्या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या कुंचल्यातून फटकारले आहे.

‘ए कमला, रडवू नकोस माझ्या बळीराजाला’ असे व्यंगचित्र काढून आपल्या कुंचल्यातून प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकार कसे देशोधडीला लावत आहे हे दाखवून दिले आहे.क्लाईड क्रास्टो हे नेहमी आपल्या व्यंगचित्राच्या कुंचल्यातून केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवत आले आहेत. केंद्रातील मोदी सरकारला नाही परंतु कांद्याला बळीराजाची कीव आली आहे हे क्लाईड क्रास्टो यांनी मांडत एकप्रकारे केंद्रावर निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात ‘सीएए’ लागू होऊ देणार नाही ?, तुझ्या बापाचे राज्य आहे का?

swarit

पत्नी रुग्णालयात, मुलगा कोरोनाशी झगडतोय..ठाकरे महाराष्ट्र सांभाळतायत,उद्धव ठाकरे होणं अवघडं!

News Desk

पंढरपूर मंगळवेढा फेरनिवडणुकीची मागणी राष्ट्रवादीने केली नाही, राष्ट्रवादीच्या लीगल सेलचे स्पष्टीकरण!

News Desk