HW News Marathi
महाराष्ट्र

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

गोंदिया | भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मधुकर कुकडे २,७०,४७१ मतांनी विजयी झाले. तर भाजपचे हेमंत पटले २,४३,२०४ मतांनी पराभूत झाले. ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षासाठी प्रतिष्ठेची लढाई होती. मधुकर कुकडे हे ४० हजार मतांनी विजयी झाले.

भंडारा- गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे भाजपच्या खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे भंडारा-गोंदियात पोटनिवडणूक घेण्यात आली. २८ मे रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान झाले होते. परंतु मतदानाच्या वेळी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे ४९ मतदान केंद्रावर ३० मे रोजी फेरमतदान घेण्यात आले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘नागपूर पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?’ नितीन राऊत म्हणाले…..

Jui Jadhav

जिओच्या प्रचंड रेट्यामुळे आमचा व्यवसाय धोक्यात, केबल चालक राज ठाकरेंच्या भेटीला

News Desk

विज्ञान एक्स्प्रेस’ नागपुरात; अनेक प्रयोग बंद असल्याने नाराजी

News Desk
राजकारण

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

News Desk

मुंबई | महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी झटणारा ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दुःखद निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पार्थिवाचे सोमय्या रुग्णालय येथे जाऊन आठवले यांनी अंत्यदर्शन घेतले. शहरी भागासोबतच विदर्भातील ग्रामीण प्रश्नांची पांडुरंग फुंडकर यांना चांगली जाण होती. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचे रिपब्लिकन पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. लोकसभा सदस्य असताना त्यांच्याशी माझे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Related posts

गरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार

News Desk

भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ, आता तरी आत्मचिंतन करा !

News Desk

माफीय संजय राऊतला आता हिशोब द्यावा लागणार! – किरीट सोमय्या

Aprna