HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या ठाण्यातील उमेदवारांचा अर्ज मागे, मनसेला पाठिंबा

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नगरसेवक सुहास देसाई यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. आघाडीकडून मनसे उमेदवार अविनाश जाधव यांना पाठिंबा दिल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि मनसे यांच्यात अधिकृत युती जाहीर झाली नसली तरी काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी एकमेकांना पाठिंबा दिला आहे. यामुळे मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची छुपी युती असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळा रंगल्या आहेत.

तसेच नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असून यांचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब सानप यांना होणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोथरूड मतदारसंघातून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या भागात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार आहे. त्यांच्याविरोधात एकाच उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत विरोधी पक्षांमध्ये एकमत झाल्याचे स्पष्ट चित्र दिसून आले आहे. अनेक मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी आणि मनसे यांची मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. यामुळे ठाणे शहर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार मागे घेतल्याने याठिकाणी मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपचे संजय केळकर यांची लढत होणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युलावर भाजपसोबत यावे, रामदास आठवलेंचा सल्ला

News Desk

राज्यात ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविणार

News Desk

अर्थसंकल्प हा निवडणुकीचा जाहीरनामा आहे, की सरकारी मालमत्ता विक्रीचे संकल्प पत्र !- बाळासाहेब थोरात

News Desk