HW News Marathi
Covid-19

मुंबईतील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पालिकेच्या नव्या गाईडलाईन्स जारी

मुंबई | राज्यातील कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परिणामी मुंबई महापालिकेने कोरोनासंबंधी नवी गाईडलाईन जारी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीचा वेग पाहता सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये बेड्स भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबई महापालिका सतर्क झाली आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयातील बेड्स ताब्यात घेण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत. कोरोनाच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबईत वॉर्ड वॉर रुम तयार करण्यात येणार आहेत. कोरोना रुग्णांना थेट बेड न देण्याची सूचना मुंबई महापालिकेने केली आहे.

सरकारी आणि खासगी रुग्णालयातील बेड्सचं योग्य नियोजन व्हावं, यासाठी मुंबई महापालिकेने हे पाऊल उचललं आहे. वॉर्ड वॉर रुमला माहिती दिल्याशिवाय रुग्णांना बेड देता येणार नाहीत. सरकारी रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होम याठिकाणी लक्षणे नसलेल्या आणि कोणतेही दीर्घकालीन आजार नसलेल्या कोविड रुग्णाला बेड देऊ नये. तसेच खासगी रुग्णालयांमधील ८० टक्के बेड आणि १०० टक्के आयसीयू बेड महापालिका ताब्यात घेणार आहे. वॉर्ड वॉर रुममधून रुग्णालयातील बेड्सचं नियोजन करण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

आरोग्यमंत्री राजेश टोपे राय म्हणाले?

“ज्या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत तेव्हा वाढणारे रुग्ण, आपल्याकडे असणारी संसाधनं या सगळ्याचं आपण मोजमाप करत राहतो. वाढत राहणारी संख्या पुढच्या आठवड्यात किती असेल त्यावेळी किती बेड उपलब्ध असतील याचा अभ्यास करणं यंत्रणेची गरजच असते. त्यामुळे लॉकडाऊन हा विषय कोणालाच मान्य नाही, आवडत नाही, प्रियदेखील नाही. पण परिस्थिती येते तेव्हा ऐनवेळी लॉकडाऊन करत नसतो. तो अभ्यास कऱण्याचा विषय असतो. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून अनेक बैठकांमध्ये यावर चर्चा केली आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

“लॉकडाउन हा शेवटी विचार करुन निर्णय घेण्याचा विषय आहे. जसं निर्बंध कडक करायचे असतील तर कसे करायचे, उद्योगांना हात लावू नये, स्थलांतरित मजुरांचा मुद्दा उपसिथ्त झालेल्या क्षेत्राला हात लावू नये वैगेरे अशा अनेक गोष्टींचा अभ्यास होत असतो. त्या अभ्यासातून , परिस्थितीवर नजर ठेवून नंतर निर्णय घेतला जात असतो. त्यामुळे तात्काळ लॉकडाउनचा निर्णय घेला जात नाही. निर्बंध कडक करत जावं लागतं,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात दुसऱ्यादिवशी देखील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त

News Desk

देशात कोरोनाचा कहर ! मृतांच्या आकड्याने गाठला उच्चांक

News Desk

पुण्याच्या अनलॉक नियमांत बदल, सुरु झालेली ‘ही’ दुकाने होणार बंद!

News Desk