HW News Marathi
देश / विदेश

‘दिल्लीला ७०० मेट्रिक टन ॲाक्सिजन पुरवा’ सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारलं !

दिल्ली | राजधानी दिल्लीला ॲाक्सिजन पुरवठा करण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोदी सरकारला फटकारले आहे.दिल्लीमध्ये सध्या कोरोनाची भीषण परिस्थिती आहे ,ॲाक्सिजन अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे आज (७ मे) ला न्यायालयाने दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ॲाक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा,असे केंद्र सरकारला स्पष्टपणे सांगितले आहे.

आज व्हिडीओ कॅान्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सांगितलं की, ‘दिल्लीला दररोज ७०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे.आमचा पुढचा आदेश येईपर्यंत दिल्लीतील रुग्णालयांना ७०० मेट्रिक टन ॲाक्सिजनच पुरवठा केला जावा’असे त्यांनी स्पष्ट केले.

एकीकडे केंद्र सरकारने दिल्लीला जास्तीचा ॲाक्सिजन पुरवल्याची माहिती दिलीये तर दुसरीकडे या सुनावणीदरम्यान दिल्ली सरकारचे वकील राहुल मेहरा यांनी सांगितलं की ,सकाळपर्यंत दिल्लीला ८६ मे.टन ॲाक्सिजन मिळाला आहे आणि १६ मे.टन मिळणार आहे.

दरम्यान केंद्र सरकारवर सध्या दिल्ली उच्च न्यायालयानंतर सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.याआधी दिल्लीला ७०० मे.टन ॲाक्सिजन पुरवण्याच्या आदेशाचे पालन न केल्याने केंद्र सरकराच्या अधिकाऱ्यांवर उच्च न्यायालयाने कारवाईचे अस्त्र काढले परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगिती दिली.अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. केंद्रालाही फटक्यात असताना आम्हाला सरकारविरोधात कठोर निर्णय घ्यावे लागतील अशी परिस्थिती निर्माण करु नका अशा शब्दांत सुनावले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…तरीही मी फडणवीसांना महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग म्हणणार नाही !

News Desk

रशियन सरकारवर टीका केली तर होणार तुरुंगवास

News Desk

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, २९ जणांचा मृत्यू

News Desk