HW News Marathi
देश / विदेश

निवडणुकीतील अपयशामुळे सोनिया गांधी नाराज,कोरोना परिस्थितीवरून मोदींवरही बरसल्या !

दिल्ली | देशातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस अधिक बिकट होत चालली आहे .ही परिस्थिती हाताळण्यामध्ये मोदी सरकार पुर्णपणे अपयशी झाल्याचा ठपका काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ठेवला आहे . देशातील मुख्य पक्षांतील नेत्यांना जनतेविषयी सहानुभूती नाही,असे म्हणतं त्यांना भाजपवर निशाणा साधला. आज काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत त्या बोलत होत्या.

सोनिया म्हणाल्या की ,आपला देश सध्या मोदी सरकारच्या दुर्लक्षाच्या गर्तेत बुडत आहे. कोरोनाची ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी देशाला आता सक्षम आणि दूरदृष्टी असणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे.कोरोनाविरूद्धची ही लढाई राजकीय मतातरांपेक्षा पुढे गेलीये,आपल्या देशाला एकत्रितपणे ही लढाई लढावी लागेल,असे ही त्या म्हणाल्या.

सोनिया गांधींनी मोदींना सुचवला ‘हा’पर्याय

देशावर ओढवलेली कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरतयं अशी टिका करतानाचं सोनिया गांधींनी मोदींना एक पर्याय सुचवला आहे. सरकारने कोरोना परिस्थितीसंदर्भात एक सर्वपक्षीय बैठक घ्यावी असं सोनिया गांधींनी म्हटलयं.तर दुसरीकडे एक स्थायी समिती स्थापन करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

५ राज्यांतील निवडणुकीत काँग्रेसच्या कामगिरीबद्दल सोनिया काय म्हणाल्या ?

५ राज्यामंध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी समाधानकारक झाली नाही ,यावर सोनिया गांधी म्हणाल्या, “काँग्रेस पक्षाची या निवडणुकीतली कामगिरी निराशाजनक होती आणि त्यामुळे सर्वांनी मिळून यातून योग्य तो धडा घ्यायला हवा.”

५ राज्यांच्या निवडणुक निकालानंतर पहिल्यांदाचं सोनिया गांधी यांनी पक्षांच्या खासदारांशी संवाद साधला.केरळ आणि आसाममध्ये काँग्रेसला आलेलं अपयश आणि पश्चिम बंगालमध्ये ओढवलेली नामुष्की यांमुळे सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधी पक्षाची एकजूट ही काँग्रेसशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, ममता-सोनियांच्या भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया

News Desk

विमान नको…केवळ जम्मू-काश्मीरमधील लोकांना भेटण्याचे स्वातंत्र्य द्या !

News Desk

काँग्रेसने आमचा प्रस्ताव नाकारला तर त्यांचं नुकसान होईल! – संजय राऊत

Aprna