HW News Marathi
महाराष्ट्र

निर्बंध लावण्याबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपेंचे मोठे विधान

मुंबई | कोरोनाच्या नवा व्हेरियंट ‘ओमीक्रॉन’मुळे देशासह राज्याची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचे सत्र सुरू आहे. ज्या १२ देशात ओमीक्रॉनचे नवे रुग्ण आढळले आहेत. त्या देशातील विमान सेवा बंद करण्याची गरज असून केंद्र सरकारने विमान बंदीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. टोपेंनी आज (२९ नोव्हेंबर) टास्ट फोर्स आणि प्रशासनासोबत बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

दरम्यान, राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबरला सुरू होणार आहे, अशी माहिती टोपेंनी राज्यातील शाळासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर टोपेंनी उत्तर दिले. गेल्या महिन्याभरापासून दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत १ हजारहून अधिक लोक आले आहे. ओमीक्रॉन अतिवेगाने पसरणारा विषाणू असल्याचे देखील त्यांनी सांगितले. जर राज्यात निर्बंध लावण्याची वेळ आल्यास विरोधकांना विश्वासात घेणार असल्याची माहिती टोपेंनी दिली आहे. तसेच देशांतर्गत प्रवाशांचीही महिन्याभरात चेकिंग करणार आहे.

दरम्यान, या नव्या कोरोना व्हेरियंटचा शोध RTCPR चाचणीच्या माध्यमातून टेस्टिंग होऊ शकते. तसेच राज्यात लवकरच जिनोम सिक्वेन्सिंगच्या लॅब वाढवण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ नये, याबाबत विधिमंडळात सोमवारी विधेयक मांडणार! – अजित पवार यांची घोषणा

Aprna

३६५ दिवस शिवजयंती साजरी व्हायला हवी !

swarit

राज्य सरकारने केले ६ हजार २०० लोकांचे पुनर्वसन

News Desk