HW News Marathi
महाराष्ट्र

पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज!

मुंबई। राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई, कोकण, पालघर, मराठवाड्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर विदर्भातील अनेक भागांत जोरदार पावसाची नोंद झाली आहे. अशातच राज्यात पुढील ४८ तास मुसळधार पाऊसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पालघर, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्य़ामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यासाठी पावसासाठी पुढील २ दिवस अधिक महत्त्वाचे आहेत. या जिल्ह्यांमध्ये पुढील काही तासांत वेगवान वाऱ्यांसह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भ आणि मराठवाड्यातील सर्व राज्यांमध्ये तर २२ ते २६ सप्टेंबर या दरम्यान राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे राज्याभरात पावसाची संततधार पुढील काही दिवस कायम राहणार आहे.

मराठवाडा, कोकण आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उर्वरित महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या आणि मध्यम सरी कोसळणार आहेत. विदर्भात पुढील चार दिवस बऱ्याच ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे.

मुंबई, पालघर ठाण्यात मुसळधार

मुंबईसह ठाणे भिवंडी, बदलापूर, कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर आणि डोंबिवली पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने आज जोरदार हजेरी लावली. वाऱ्यासह पडणाऱ्या पावसामुळे संपूर्ण परिसरात गारवा निर्माण झाला आहे. पालघर जिल्ह्यातही सलग तिसऱ्या तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पालघर, चिंचणी, जव्हार, मोखाडा, डहाणू भागात जोरदार पाऊस झोडपून काढले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तासगाव तालुक्यात  देशी दारूच्या दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र मिळणार ?

News Desk

मराठा समाजाला लॉटरी, १६ टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती

News Desk

राजकीय आणि उर्वरित आयुष्यात लोकांनी बनवलेली लिडर होणं पसंत करेन – उर्मिला मातोंडकर

News Desk