HW News Marathi
महाराष्ट्र

मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी, संधी मिळताच आडवं करावं !

मुंबई | सामनाच्या ‘रोखठोक’ या सदरातून आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्याविरुद्ध सगळ्यांनी एकत्र लढायला हवे अशी हाक दिली आहे.तसेच ‘ठाकरे आणि पवार ‘ ब्रॅंड मुंबईमधुन नष्ट करून ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न चालु असल्याचे राऊतांनी म्हटले आहे.तसेच कंगणाला भाजपचे नेते पाठिंबा देतायतं यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊतांनी ‘रोखठोक’ सदरात लिहिलेल्या गोष्टींवर भाजप नेते निलेश राणे यांनी आपल्या ट्विटमधून जोरदार टिका केली आहे. राणेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, “संजय राऊतांसारखा भंगार माणूस कुणी नाही. कारण परिस्थिती अंगावर आली हे लक्षात आलं की, फक्त मराठी अमराठी वाद लावून द्यायचा की लोग आपोआप स्वत:ला वाटून घेतात आणि शिवसेनेचं काम सोपं होतं. मराठी माणसाने आतातरी यांची चाल ओळखावी आणि संधी मिळताच यांना आडवं करावं.”

राणे असही म्हणतात की ,’संजय राऊत म्हणतात पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्याला सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय??? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कळवा दुर्घटनेनंतर प्रवीण दरेकर आक्रमक, संबंधित अधिकाऱ्यांवर मोक्का लावण्याची मागणी!

News Desk

नवी मुंबईत व्यंकटेश्वराच्या मंदिरासाठी जमीन देण्याचे पत्र आदित्य ठाकरेंनी केले तिरुपती देवस्थानास सुपूर्द

News Desk

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलं पत्र….!

News Desk