HW News Marathi
महाराष्ट्र

“2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही”, निलेश राणेंचं प्रत्युत्तर

मुंबई। भाजप नेते निलेश राणे सध्या आक्रमकेटच्या भूमिकेत आहेत. शिवसेने नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. “नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही,” असं राऊत यांनी म्हटलंय. त्यानंतर आता निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले आहेत. “सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही,” असा पलटवार निलेश राणे यांनी केलाय. ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते.

त्यांना राणेंचे महत्व समजणार नाही

“नारायण राणेंसारखा वजनदार माणूस कोकणासाठी काय करून आणू शकतो हे राऊतांना समजणार नाही. कारण त्यांनी साधी बालवाडीसुद्धा कोकणात बांधली नाही. त्यांना राणेंचे महत्व समजणार नाही. कोकणातील हीच पिढी शिवसेनेला संपवेल. त्यामुळे फार सात पिढ्या लांब जाण्याची गरज नाही. 2024 नंतर विनायक राऊत आणि त्यांची कुठलीच पिढी कोकणात दिसणार नाही, याची खात्री आम्ही ही घेतली आहे. लोकही घेतील,” असा पलटवार निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर केला आहे. .

विनायक राऊत हे दखल घेण्यासारखं पात्र नाही

विनायक राऊतांवर टोला लागवताना ते पुढे म्हणाले, “तसेच पुढे बोलताना, विनायक राऊत हे दखल घेण्यासारखं पात्र नाही. मात्र राणेंची हीच पिढी जे काही करायचं ते करेल. राणेंचा पुढच्या जन्मावर विश्वास नाही. आम्ही काही करण्यापेक्षा कोकणातील जनताच आता शिवसेनेला संपवेल, याची खात्री आहे. कारण यांना करायचं काहीच नाही. बोलाचा भात आणि बोलाचीच कढी अशी यांची अवस्था आहे. यांचे मुख्यमंत्रीसुद्धा तसेच आणि आमदार, खासदारही तसेच आहेत. त्यामुळे जनआशीर्वाद यात्रा कशासाठी आहे ? हे विनायक राऊत यांना समजणार नाही,” असा टोलादेखील निलेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणले विनायक राऊत?

भाजप नेत्यांच्या जनआर्शिवाद यात्रेवरून शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर जोरदार टिका केली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनाही लक्ष्य केलं. जनआशीर्वाद हा शब्द शिवसेनेचाच आहे. तो भाजपने चोरला आहे. अडगळीत टाकलेल्या मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे कोकणात सेनेची ताकद कमी होणार नाही. नाराय़ण राणेंच्या सात पिढ्या आल्या तरी कोकणातील शिवसेनेची ताकद कमी होणार नाही. नाराय़ण राणेंचा शिवसेनेनेच दोन वेळा पराभव करून दाखवून दिलंय. नाराय़ण राणें म्हणजे पनवती आहेत,” अशी घणाघाती टीका विनायक राऊत यांनी केली होती.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी अपक्ष आहे, कुठल्याही पक्षात गेलो तरी अडचण नाही !

News Desk

भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक हा पद्म पुरस्कारांचा निकष आहे का? – सचिन सावंत

News Desk

पैसे कमावणे हा शिवसेनेचा एकमेव धंदा आहे – नारायण राणे

News Desk