HW News Marathi
महाराष्ट्र

आधी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा – निलेश राणे

मुंबई | चीन आपली जमीन बळकावत आहे. पण आपले राज्यकर्ते कायर आहेत. काँग्रेसची सत्ता असती तर चीनला १५ मिनिटांत बाहेर काढलं असतं, असं वक्तव्य काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्यांच्या याच वक्तव्याला अनुसरून भाजप नेते निलेश राणे यांनी टोला लगावला आहे. ‘चीनचं जाऊ द्या, आधी मुख्यमंत्र्यांना मातोश्रीबाहेर काढून दाखवा’, असा टोला भाजप नेते निलेश राणे यांनी राहुल गांधींना लगावला आहे.

चीनचं राहू द्या तुमची सत्ता महाराष्ट्रात आहे, आधी एक काम करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना घराच्या बाहेर काढून दाखवा, असं ट्विट करत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “राहुल गांधींचा इतिहास कच्चा आहे, जेव्हा काँग्रेसचे ए. के. अँटनी संरक्षणमंत्री होते तेव्हा चीनने भारताच्या काही भागांमध्ये घुसखोरी केली होती. पण अँटनी यांनी हसत उत्तर दिलं, आमच्या चर्चा सुरू आहेत. चीनने घुसखोरी केलेला भाग तेव्हा भारताला मिळाला नाही. राहुल गांधी कधी हुशार होणार?”, असं ट्विट करत त्यांनी राहुल गांधीवर देखील टीका केली आहे.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

पंतप्रधान मोदी हे कायर आहेत. त्यांनी चीनला आपली जमीन बळकावण्याची संधी दिलीये. मात्र याच जागी काँग्रेसचं सरकार असतं तर चीनला १५ मिनिटांतच बाहेर फेकून दिले असते, असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. कृषी विधेयकावरून देखील राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाश्त्यावर ताव मारुन काँग्रेसचे उपोषण

News Desk

मुंबईतील सर्व उद्याने, मैदाने, चौपाट्या सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत सुरू!

News Desk

…अन् फडणवीस म्हणाले आम्ही वेटिंगवर राहात नाही!

News Desk