HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार हरला तर त्याला शिवसेना जबाबदार असेल!

मुंबई | बेळगाव लोकसभा निवडणूक १७ एप्रिलला पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार शुभम शेळीने यांच्या प्रचारासाठी शिवसेना नेते संजय राऊत बेळगांवमध्ये गेले होते. त्यांच्या या बेळगाव दौऱ्यावर भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी भाष्य केले आहे.काँग्रेसला जिंकवण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पाडण्याचे काम केले.

“महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार बेळगावात हरला तर फक्त शिवसेना जबाबदार. काँग्रेसला जिंकवण्यासाठी संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीची दिशाभूल केली आणि महाराष्ट्राची बाजू कमजोर करण्याचं पाप शिवसेनेने केले. जी एकी समितीमध्ये होती, त्याच्यामध्ये फूट पाडण्याचे काम राऊतांनी केले.” असे ट्विट निलेश राणे यांनी केले आहे.

 

भाजप खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. येत्या १७ एप्रिलला बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार असून २ मेला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत भाजपकडून सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी आणि काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी रिंगणात आहेत.

त्यांच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके अशी टक्कर चांगलीच रंगणार आहे. त्यामुळे या निवडणूकीत कोणाचा विजय होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान, शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर याही बेळगावात गेल्या होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

News Desk

पृथ्वीराज साठे यांना काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी बढती

News Desk

ही यात्रा कोणत्याही पदासाठी नसून महाराष्ट्र घडविण्यासाठी !

News Desk