HW News Marathi
महाराष्ट्र

“नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात”, राऊतांच्या ‘त्या’ विधानावर निलेश राणेंचा 

मुंबई | एकीकडे चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाघावरून सुरू झालेला वाद रंगत असताना दुसरीकडे आता भाजप नेते निलेश राणे यांनी देखील यात उडी घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वाघासंदर्भातल्या केलेल्या विधानावरून निलेश राणे यांनी खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे. “नाक्यावर उभे राहणारे टपोरीही स्वत:ला वाघ समजतात. वाघ बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो”, असं निलेश राणे म्हणाले आहेत. त्यामुळे बुधवारी पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी सुरू केलेल्या ‘वाघ’ प्रकरणावरून आता दोन्ही पक्षांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत आहे.

काय आहे निलेश राणेंचं ट्विट?

संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर निलेश राणेंनी ट्वीटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. “नाक्यावर उभे राहणारे टपोरी पण स्वत:ला वाघ समजतात. बकरी नावाचा चहा सुद्धा येतो आणि टायगर नावाचा बाम सुद्धा येतो. स्वत:ला वाघ म्हटल्यावर वाघ झाले असते, तर जंगलातल्या वाघांची किंमत संपली असती”, असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.

“वाघ आता पिंजऱ्यातला झालाय, आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती” – चंद्रकांत पाटील

पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. “आज माझा वाढदिवस आहे. त्यामुळे कटू बोलायला नको. संजय राऊतांनी मला मनाविरुद्ध का होईना गोड म्हटलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटलं चांगलंय, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटलं आम्ही दोस्ती करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातल्या वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झालाय”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

वाघ ठरवेल मैत्री कुणाशी करायची… – संजय राऊत

दरम्यान, संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वाघासंदर्भातल्या विधानावरून त्यांनी टोला देखील लगावला होता. “चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची”, असं संजय राऊत म्हणाले होते.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

वाघाशी दोस्ती करावी यासाठी मला वाघ भेट दिला, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. उद्धवजीं जुनी मैत्री मोदीजींशी आहे असं सांगितलं. त्यांचं म्हणणं फडणवीस-पाटलांशी जमत नाही. इकडे दोस्ती असती तर 18 महिन्यापूर्वीच सरकार आलं असतं. मोदींनी जर सांगितलं, त्यांची इच्छा असेल तर त्यांची इच्छा ही आमच्यासाठी आज्ञा. मोदींजींनी आदेश दिल्यावर काय वाटेल ते करु. जरी भाजप-शिवसेनेचं सरकार आलं, असं मी म्हणत नाही, पण तुम्ही ज्या चर्चा करताय, त्यानुसार जरी सरकार आलं तरी निवडणुका वेगळ्याच होणार, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्यातील मराठा समाजाची दिशाभूल केली जातेय, पंतप्रधानाकडे यासंदर्भात काहीच नाही. मराठा समाज हा मागास आहे हे आधी ठरवावं लागेल. राज्य सरकारकडून धूळफेक सुरू आहे, असा आरोप चंद्रकांत पाटलांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या सवलती मराठा समाजाला दिल्यात त्या तरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण गेलं ते फक्त महाराष्ट्रात गेलं त्याला मोदी काय करणार असाही सवाल त्यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ध्वनी प्रदूषणामुळे २०२ गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल

swarit

निवासी डॉक्टरांच्या विद्या वेतनात १० हजारांची वाढ, ठाकरे सरकारचा निर्णय

News Desk

दिवाळीनंतर मंदिरे उघडण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संकेत 

News Desk