HW News Marathi
महाराष्ट्र

“पोकळ आश्वासनांचा धंदा असता, तर मुख्यमंत्र्यांचे जगभर कारखाने असते”, निलेश राणेंचा प्रहार

मुंबई | भारताच्या पूर्व किनारपट्टीवर Yaas चक्रीवादळाचं थैमान सुरू असताना महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टीवर धुडगूस घातलेल्या तौक्ते चक्रीवादळाची चर्चा अजूनही थांबलेली नाही. या वादळाचा फटका महाराष्ट्रासह इतरही राज्यांच्या किनारी भागांना बसला आहे. महाराष्ट्रातील चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या कोकणातील भागाला मदत जाहीर केली आहे. मात्र, तरीही विरोधकांकडून तोंडसुख घेतलं जात आहे. भाजप नेते निलेश राणे यांनी टीका केली आहे. “पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता, तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते” अशी खोचक टीका निलेश राणे यांनी केली आहे.

ठाकरे सरकार ज्योतिषासारखं तारखा देतंय!

भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तौते चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा संदर्भ घेऊन त्यांनी लिहिलंय, “हे घ्या, अजून एक पोकळ आश्वासन. पोकळ आश्वासनांचा जर धंदा असता, तर उद्धव ठाकरेंचे जगात कारखाने असते. १० दिवस झाले, एक कवडी दिली नाही. अनेक गावांत अजूनही लाईट नाही. रॉ मटेरियल (कच्चा माल) नाही. पण ठाकरे सरकार फक्त ज्योतिषासारखे तारखा देत आहेत”.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

राज्य सरकार गेंड्याच्या कातडीचे, मराठा तरुणांच्या नियुक्त्या लवकरात लवकर कराव्यात !

News Desk

कोल्हापुरातल्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेणार दिल्लीतील केंद्रीय पथक!

News Desk