HW News Marathi
महाराष्ट्र

जोपर्यंत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही – निलेश राणे

मुंबई | गेल्या काही दिवसांत राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाल्याने राज्य सरकार आणि प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काल (२१ फेब्रुवारी) जनतेला संबोधित करताना दैनंदिन व्यवहारांवर काही निर्बंध आणण्याची घोषणा केली आहे. यादरम्यान राज्यातील राजकारणाला जोर आला असून. भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही कोरोनावरुन राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत ट्विट केलं आहे.

निलेश राणे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ‘जगामध्ये उद्धव ठाकरेंसारखा विद्वान माणूस नसेल. जो पर्यंत ते मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्रातून कोरोना जाणार नाही आणि ते कोरोना जाऊ देणार नाहीत. कुठल्या राज्यात कोरोना इतक्या झपाट्याने पसरत नाही, फक्त महाराष्ट्रात पसरतो कारण मुख्यमंत्र्यांनाच घरीच बसायला आवडत’, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

अजून एका ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले की, ‘राज्यात १४ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणूका झाल्या, महाराष्ट्रात आंदोलने झाली तेव्हा कोरोनाची आकडेवारी वाढली आहे. मात्र, अधिवेशनाच्या तोंडावर कोरोना वाढला? लाॅकडाऊनच्या संकटात लोकांच्या नोक्ऱ्या, बॅंकेचे हफ्ते, लाईटबील घेऊन सुद्धा ठाकरे सरकारला अधिवेशनाला जायचं नाही म्हणून महाराष्ट्रात परत लाॅकडाऊन होतो आहे’.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीच्या मंत्र्यांकडून बदल्यांमध्ये कमाई झाल्याने दिसून आले, त्यामूळे सीआयडी चौकशी करावी – चंद्रकांत पाटील

News Desk

खडसेंनी नैतिकतेच्या गोष्टी करु नयेत – प्रवीण दरेकर

News Desk

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा सोहळा रद्द

News Desk