HW News Marathi
महाराष्ट्र

हिंमत असेल तर मंत्रालय २४ तास चालू ठेवून दाखवा !

मुंबई | कधीही न झोपणारे शहर म्हणून ओळख असणाऱ्या मुंबईत अधिकृतरित्या नाईट लाईफ असावी असा प्रस्ताव पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मांडला. या प्रस्तावाला मंजुरी मिळेल नाही मिळेल या वादात असताना या नाइटलाइफवरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर सोशल माध्यमांच्या द्वारे निशाणा साधला आहे. ‘हिंमत असेल तर मंत्रालय २४ तास चालू ठेवून दाखवा’, असा टोला लगावत निलेश राणेंनी ट्विट केले आहे.

आदित्य ठाकरेंनी मांडलेला हा प्रस्ताव येत्या २६ जानेवारीपासून प्रायोगिक तत्त्वावर हा प्रस्ताव राबविण्यात येणार असल्याचे म्हटले जात होते. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र भाजपकडून नाइटलाइफला विरोध होत आहे. निलेश राणे यांनी नाइटलाइफवरून शिवसेनेवर टीका केली आहे. शिवसेना आणि आदित्य ठाकरे आग्रही असलेल्या नाइटलाइफचा किती लोकांना उपयोग होणार आहे ? असा सवालही निलेश राणेंनी उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३० हजार कोटी द्यावेत! -बाळासाहेब थोरात

News Desk

“मराठा आरक्षणाचा खरा ‘टक्का’ कोण सांगेल आणि देईल?”, पंकजा मुंडेंचा सरकारला सवाल

News Desk

देवेंद्र फडणवीस आज साताऱ्यात पूरग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी रवाना!

News Desk