HW News Marathi
महाराष्ट्र

नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावा?, नितेश राणेंचा रोहित पवारांना टोला

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी कोणीही पूरग्रस्थ भागात दौरे करू नये असं सांगितलं असून सुद्धा रोहित पवारांनी पूरग्रस्थ भागात दौरा केला आहे. या गोष्टीवरून आता राजिक्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान रोहित पवारांच्या या दौऱ्यावरुन आता विरोधक त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवताना पाहायला मिळत आहे. माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यानंतर आता आमदार नितेश राणे यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय. तसंच अजित पवार यांना नारायण राणेंवर केलेल्या टीकेलाही नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय आहे.

रोहीत पवारांनी आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत

आजोबांनी सांगितलं दौरे करू नका पण नातू दौऱ्यावर गेला. रोहित पवारांच्या दौऱ्यावर आता विरोधी पक्ष त्यांच्यावर टीका करत आहेत. सातत्याने पवार कुटुंबात विसंगती दिसते. अवेळी बोलणं, जास्त बोलणं हे कधीच पवार कुटुंबीय करत नाही. पार्थ पवार ,सुप्रिया सुळे अस बोलताना कधी दिसले नाहीत. रोहीत पवारांनी आपल्या आजोबांकडून योग्य गोष्टी शिकल्या पाहिजेत. त्यांचं ऐकलं पाहिजे. नातूच आजोबांचा विचार पाळत नसेल तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी का पाळावे असा प्रश्न सगळ्यांच्या समोर येतो. म्हणून रोहीतजींनी थोडं शिकून मगच पावलं टाकावीत असा माझा मैत्रीचा सल्ला आहे, असा टोला नितेश राणे यांनी लगावला आहे.

काय म्हणाले पवार?

माझा पूर्वीचा अनुभव, विशेषत: लातूरच्या भूकंपा वेळचा अनुभव आहे. अशा घटनानंतर अनेक लोक गाड्या घेऊन त्या ठिकाणी जातात. माझं आवाहन आहे, आता शासकीय यंत्रणा पुनर्वसनाच्या कामात व्यस्त आहेत. त्यांचे लक्ष विचलित होईल, त्यामुळे अनावश्यक दौरे टाळावे. मी लातूरला असताना, आम्ही सगळे जण कामात होतो, पंतप्रधान येत होते. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं दहा दिवस येऊ नका. तुम्ही आला तर यंत्रणा तिकडे लावावी लागेल, मला आनंद आहे, माझी विनंती मान्य केली ते दहा दिवसानंतर आले. कोणत्याही नेत्यांनी प्रसंगावधान राखावं. मी सुद्धा आता दौऱ्यावर जात नाही. त्याचं कारण बाकीची यंत्रणा फिरवावी लागते. आपल्या भोवती यंत्रणा ठेवणं योग्य नाही. दौरे होत आहेत त्याने धीर मिळतो . पण दौऱ्यामुळं शासकीय यंत्रणेचं काम वाढतं. त्यामुळं दौरे होऊ नये असं मला वाटतं. दौऱ्याला गेल्यामुळं यंत्रणेला त्रास होतो, असं शरद पवार म्हणाले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अमरावतीची परिस्थिती नियंत्रित कशी ठेवायची यावर आमचं लक्ष”

News Desk

आंदोलनाची नौटंकी करून भाजपला आपले पाप झाकता येणार नाही नाना पटोले!

News Desk

अशा वातावरणात ‘ते’ माझ्या मनाला पटत नाही, वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना पत्र

News Desk